नवीन लेखन...

संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी

issues in writing marathi on computers

आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द अशुध्द असं ते जाणीत नाहीत किंवा या बाबतीत त्यांचं फारसं देणंघेणं नसतं.

त्यामुळं संगणकीय लेखनात काही गैरसोयी झाल्या आहेत त्याबरोबरच काही सोयीही झाल्या आहेत. ‘रवी’ आणि ‘खी’ हे निराळे ओळखता येतात. वानखेडे हे वानरवेडे असं वाचलं जात नाही. पद्धत किंवा शुद्ध या शब्दात, अुच्चारानुसार ‘द’ अर्धा आणि ‘ध’ पूर्ण असायला हवा पण तो तसा टाअीप करायला गेलात तर तो…पद्धत किंवा शुद्ध असाच टाअीप केला जातो. लिहीतांनाही आपण पद्धत आणि शुद्ध असंच लिहीतो. ‘ध’ हलंत (अर्धा) आणि ‘द’ पूर्ण असं टाअीप केलं तर कसं टाअीप केलं जातं ते पहा….पध्दत, शुध्द..

विश्व या शब्दात ‘श्’ चं रूप बदलून ते अुलट्या ४ सारखं होतं तर ‘व’ अर्धा होतो. काही संगणकात ‘श’ अर्धा होतो (अुलटा ४ होत नाही) आणि ‘व’ पूर्ण राहतो.

शुध्द कशाला म्हणावं आणि अशुध्द कशाला म्हणावं हेही काही वेळा समजत नाही. ‘होतं’ हे शुध्द तर ‘व्हतं’ हे अशुध्द..पण ‘नहोतं’ हे अशुध्द तर ‘नव्हतं’ हे मात्र शुध्द…हे कसं?

टाअीप केलेला हा मजकूर, माझ्या संगणकात असलेल्या सॉफ्टवेअरनुसार टाअीप झाला आहे. आता मराठी भाषेची आणि लिपीची शुध्दाशुध्दता, अक्षररूप (फॉन्ट) तज्ज्ञ आणि मराठी सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. टाअीप केलेल्या मजकूराचा आशय समजला म्हणजे फॉन्ट सॉफ्टवेअर यशस्वी झालं असं मानावं.

अक्षररूप, फॉन्ट तज्ज्ञांना काही सूचना कराव्याशा वाटतात. मागील लेखांत …. मी सुचविलेले … शिफारस केलेले स्वर :: अ ची बाराखडी :: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

यापैकी अ आ ओ औ या स्वरांना स्वतंत्र कळा आहेत. इ ई उ ऊ ए ऐ या पारंपारिक स्वरांनाही स्वतंत्र कळा आहेत. या ६ कळांना अि अी अु अू अे अै या कळा दिल्या तर इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर गाळले जातील आणि त्यांच्या जागी अि अी अु अू अे अै हे स्वर सहज टाअीप करता येतील. अॅ ऑ हे स्वर दोन कळा वापरून सहज टाअीप करता येतात. ञ आणि ङ अैवजी दुसर्या कोणत्यातरी अक्षरांना किंवा अक्षरखुणांना या कळा द्याव्यात. ऋ ची स्वतंत्र कळ आहे, ती दुसर्या कोणत्यातरी अक्षराला द्यावी. ॐ ची कळ मात्र हवीच.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..