नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेरा

पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.

पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.

आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.

आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.

अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.

या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

28.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..