नवीन लेखन...

हंपी : एक आकलन !

” तुम्हाला किष्किंधा नगरी पहायची आहे की विजयनगर पाहायचे आहे ?”

हम्पीला गेल्यावर गाईडने विचारले , आणि आम्ही संभ्रमात पडलो .
पण काहीतरी उत्तर द्यायलाच हवे होते . मी त्याला विचारले ,
“असा फरक का करतोयस तू ? त्रेता युगात जी नगरी किष्किंधा नावाने प्रसिद्ध होती , ती तेराव्या शतकात विजयनगर साम्राज्य म्हणून प्रसिद्ध होती .”
तो हसला , म्हणाला ,
” येणाऱ्या पर्यटकांना काय सांगायचे आणि हंपी तील काय काय दाखवायचे याचा अंदाज घेण्यासाठी मी विचारले .”
” माझ्या जवळ दोन दिवस आहेत आणि मला ऐतिहासिक आणि पौराणिक अशी सगळी स्थळे , माहिती हवी आहे .”
मी स्वच्छ सांगून टाकले .
आणि पुढचे दोन दिवस मी हंपी पाहत होतो , ऐकत होतो …

गाईड , वस्तू , वास्तू दाखवत आमच्यासमोर इतिहास उलगडत होता . त्याच्या सांगण्याच्या शैलीमुळे इतिहास जिवंत होत होता , नजरेसमोर तरळत होता .
हनुमानाच्या किष्किंधा नगरीमुळे संपूर्ण रामायण दृश्यमान होत होते .
मंदिरे , बाजार , पुष्करणी, पत्थर सेतू, सरोवर, पहाड, गजशाळा , विरूपाक्ष मंदिर, महाल परिसर,मातंग पर्वत, विजय विजयविठ्ठ्ल मंदिर अशी असंख्य स्थळे, तुंगभद्रा नदीचे विशाल पात्र, त्यातील मोठ्या परातीच्या आकाराच्या होड्या ( कोरक्कल), त्यातून केलेला जलविहार…
सगळं काही पाहिलं.
पण…

पर्यटन केल्यानंतर मिळणारा आनंद , होणारे समाधान …

काहीतरी हरवल्या सारखं वाटत होतं.
हुरहूर तर वाटत होतीच , पण एकाच वेळी दुःख , संताप , चीड , त्वेष , हतबलता आणि कणव सुद्धा मनात दाटत होती .

मंदिरे होतीच . अतिशय देखणी . कलात्मक. समृध्दी आणि संस्कृती यांचं नातं सांगणारी. भव्य. विशाल. एकाच पाषाणात कोरलेली. कलाकारांच्या दिव्य प्रतिभेचा साक्षात्कार सांगणारी. गुणग्राहक असणाऱ्या सर्व महाराजांच्या कलासक्ततेचा , दिलदार मनाचा , सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रचंड खर्चाचा प्रत्यय देणारी .

पाषाण सुद्धा ज्यांच्या कारागिरी समोर मऊसूत व्हावा अशी वास्तू कला , शिल्पकला .

नैसर्गिक प्रवाहांचा वापर करून निर्माण केलेली उद्याने.

प्रत्येक मंदिरासमोर सोन्याचांदीचे , घोड्यांचे , मसाल्याचे , वस्त्रप्रावरणांचे आखीव रेखीव बाजार.
एका विशिष्ट जागेसमोर गणिकांचा ही बाजार .

सर्व काही पूर्वनियोजित . प्रजेचा ,सैन्याचा विचार करून उभारलेले विजयनगरचे साम्राज्य.

मग तरीही अस्वस्थता का होती ?

कारण संपन्न साम्राज्यावर मुघल आक्रमक तुटून पडले.
एकदा नाही ,अनेकदा.

संपत्ती , सुंदर स्त्रिया लुटून नेल्या.
एकदा नाही ,अनेकदा.

चंदना पासून बनवलेले जे जे काही होते ते लुटून नेले , जे नेता आले नाही ते जाळून टाकले.
एकदा नाही ,अनेकदा.

महाकाय गणपती , उग्र नरसिंह, प्रचंड आकाराचे शिवलिंग , विठ्ठ्ल ,राम यांच्या कोणे एके काळी विलक्षण सुंदर असणाऱ्या देवादिकांच्या मूर्ती छिन्न विच्छिन्न केल्या होत्या.
एकदा नाही, अनेकदा.

ऐकताना भयंकर वाटत होतं.
मनात चीड निर्माण होत होती.
मुठी त्वेषानं वळत होत्या.
आपण पर्यटनाला आलो आहोत हे विसरून जायला झालं होतं.

पण एक विलक्षण गोष्ट गाईड सांगत होता .दाखवत होता.

जिथे जिथे विष्णुच्या वराह अवतारातील मूर्ती होत्या , त्यांना आणि त्या मंदिरांना मुघल आक्रमकांनी हात लावला नव्हता .

हंपी खूप पाहिलं .खूप ऐकलं.
पण मनात गाईड चं एक वाक्य घुमत होतं ;
तो सांगण्याच्या नादात एकदम म्हणून गेला ,

फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा !

तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती.

मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..