नवीन लेखन...

दशश्लोकीस्तुती – १०

विष्णुब्रह्मसुराधिपप्रभृतयः सर्वेऽपि देवा यदा संभूताज्जलधेर्विषात्परिभवं प्राप्तास्तदा सत्वरम् ।
तानार्ताञ्शरणागतानिति सुरान्योऽरक्षदर्धक्षणा- त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ १०॥

भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
अमृताच्या प्राप्तीसाठी देवतांनी आणि राक्षसांनी समुद्रमंथन केले. मंदर नावाच्या पर्वताला रवी तर वासुकी सर्पाला दोरी करण्यात आले. त्या घुसळणीमुळे वासुकीच्या विषाने समुद्रातून हलाहल नामक महाभयानक विष बाहेर आले.
त्या प्रसंगाचा संदर्भ घेत आचार्य श्री म्हणतात,
विष्णुब्रह्मसुराधिपप्रभृतयः सर्वेऽपि देवा यदा संभूताज्जलधेर्विषात्परिभवं प्राप्तास्तदा सत्वरम् –
जलधी अर्थात समुद्रातून निर्माण झालेल्या विषाने श्री विष्णू,ब्रह्मदेव इ. देवता देखील पराजित झाल्या. अर्थांत त्याला स्वीकारु शकल्या नाही.
त्या विषाची भयानकता इतकी होती की त्याच्या केवळ वाफेच्या स्पर्शाने पूर्वी शशिवर्ण असणारे भगवान श्री विष्णू काळे पडले.
मग बाकीच्यांचा प्रश्नच काय? सर्वच हतबल झाले.
त्यावेळी त्या सर्व देवता भगवान शंकरांना शरण आल्या.
तानार्ताञ्शरणागतानिति सुरान्योऽरक्षदर्धक्षणात् –
त्या शरण आलेल्या देवता समूहांना ज्यांनी अर्ध्या क्षणात संरक्षण दिले.
अर्थात त्यांनी अत्यंत कमी वेळात त्या विषाला प्राशन करून सगळ्यांची समस्या दूर केली. सगळ्यांना सुखी केले.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरण कमलाशी माझे हृदय कायम निवास करो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..