आज टयूमर नष्ट करण्यासाठी औषधे किंवा ऑपरेशन करावे लागते. हे काम पुढील काळात पेशीतील सूक्ष्म आरएनएच्या सहाय्याने अधिक कार्यक्षमतेने करता येईल. परंतु त्या अगोदर पेशींमधील या संपूर्ण यंत्रणेचा सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. आसावरीसारखे अनेक तरूण शास्त्रज्ञ यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. […]
ऊर्जेचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, कोळसा, जंगल, खनिज तेल आणि वायू यांचा साठा मानवाच्या उथळपट्टीने संपत आलेला आहे. तमाम मानव जातीला अपारंपारिक उर्जा स्त्राsतांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. उर्जा निर्मिती तिपटीने वाढवण्यासाठी अपारंपारिक उर्जेचा वापर प्रामुख्याने असणार आहे. अमृता सारख्या उर्जा क्षेत्रात काम करणाऱया तरूण संशोधकांना हे मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की हे आव्हान आपले तरूण संशोधक नक्कीच स्विकारतील. […]
सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला. […]
मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे […]
काही माणसं किती विलक्षण, चमत्कारिक असतात ना? ती लक्षात राहतात ती त्यांच्या गुणांमुळे नाही तर त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळेचं. मात्र ही जगाच्या दृष्टीने निरोपायागी, मुर्ख असतात. ‘दत्त्या’ हा अशांचपैकी एक. […]
डॉ. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगरमध्ये झाला. धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. […]
बरीच गाणी अशी असतात जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाज मधील “जिंदगी एक सफर है सुहाना….यहाँ कल क्या हो किसने जाना…” असे हसरत लिहून गेले( या गाण्याने हसरत यानां दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला) आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. “जाने कहाँ गए वो दिन….’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते व राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्या समोर तरळू लागतो. “झनक झनक तोरी बाजे पायलिया” चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यानां डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हरसिटी राऊंडने त्यानां डॉक्टरेट बहाल केली होती. […]
प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर. […]
मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. […]
तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. […]