नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

देवपूजेतील साधन – कलश

भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.  समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या […]

मनाचे श्लोक – १०१ ते ११०

जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची | म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101|| अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे | देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102|| हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी | […]

मनाचे श्लोक – ९१ ते १००

नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा | न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91|| अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे | हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92|| जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता | तयाचे […]

मनाचे श्लोक – ८१ ते ९०

मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो | समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81|| बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना | विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82|| जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी […]

देवपूजेतील साधन – नारळ

श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना […]

मनाचे श्लोक – ७१ ते ८०

जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती | जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71|| न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही | महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72|| देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न […]

सफलतेचा मंत्र – विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ.  त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित […]

मनाचे श्लोक – ६१ ते ७०

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा तेचि आहे | जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा ||61|| निजध्यास तो सर्व तूटोनि गेला | बळे अंतरी शोक संताप ठेला | सुखानंद आनंद भेदे बुडाला | मनी निश्र्चयो सर्व खेदे उडाला ||62|| घरी कामधेनू पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनि वेवाद लागे […]

आभामंडळाचे विज्ञान – एक ओळख (तेजोवलय, ऑरा)

सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ दुर्लक्षित केलेले आहे. रोजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार (फास्टफूड), स्पर्धात्मक युगातील टेंशन्स, रोज पूढे येणाऱ्या असंख्य अडचणी, अति जनसंपर्क, अॅलोपॅथी औषधांचा अतिवापर या सगळ्या गोष्टी शरीर मनावर अतिरिक्त ताण उत्पन्न करतात, असंतुलन वाढते. शरीरातील सकारात्मक उर्जा कमी होते. नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, ऊर्जावाहिनी नाड्यांमध्ये या कारणाने […]

रामदासस्वामींचा सार्वजनिक गणेशोत्सव

भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे. ‘विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी […]

1 131 132 133 134 135 143
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..