नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

वह्या, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते. […]

स्पीड गन

रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे. […]

डॉ. सी. एन. आर. राव

डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली. […]

संगणकीय विषाणू

संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख… […]

क्रिप्टोग्राफी

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात. […]

प्रा. एम. एम. शर्मा

१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. […]

उद्वाहक (लिफ्ट, एलेव्हेटर)

अलीकडच्या काळात निवासी इमारती, रुग्णालये व इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या इमारती या बहुमजली आहेत. त्यांचे जिने चढून हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याने वृद्धच काय पण तरुण माणसांचीही दमछाक होते. […]

डॉ. पॉल रत्नसामी

पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता. […]

एअरबॅग

कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही त्याचे एक मोठे कारण आहे. […]

डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. […]

1 10 11 12 13 14 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..