नवीन लेखन...

प्रकट दिन

असे कसे प्रकट होतात काही संतजन ज्यांना नसतात मायबाप नसते जन्मतारीखही प्रकटू देत त्यांचे त्यांना भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी मला काय त्याचे…. पण म्हणतो देशासाठी देशाच्या सिमेवरही प्रकट व्हा हो संतानो असेच युध्दाचे वेळी हजारो संख्येनी !

कविते-बिवितेसाठी?

घर -दार ऑफिस- बिफीस पोरं-सोरं लोकल -बिकल रीक्षा -बिक्षा रोज दिवसभर जा- ये पुन्हा तसंच ये -जा लोकल- बिकल परत -फिरत घर -बार जेवण- खावण जीवन -बिवन चालत राहतं वेळ कुठे कविते-बिवितेसाठी? ती तर सतत–सोबत पाठी- पाठी मुखी -ओठी/// # कौशल श्रीकांत पेटकर ९७६९२१३९१३ 

एक झाड

एक झाड सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं अक्षरांनी लगडलेलं मी वेचतो,मी तोडतो मी जमवतो खुप अक्षरे आणि बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून माळेसारखी ओवून वाचकासाठी ठेवतो काही माझ्यासाठीही….. कुणी म्हणतात याला कविता कुणी गझल आणि कुणी काहीही! — श्रीकांत पेटकर

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना । निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना  ।।१।। वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी । नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी ।।२।। जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें । मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।। प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं । […]

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ….१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड……२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें….३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती…४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक […]

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येतो राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटतो….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे ते रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।। नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।। स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।। स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दूजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।। ओंगळपणाचे […]

चालणे सुरु तर कर

चालणे सुरु तर कर ….पोहोचणार नाही कशावरुन ? बोलणे सुरु तर कर …टाळ्या पडणार नाही कशावरुन ? टिम्ब काढ रेषा होतील…रेषारेषांचे चित्र जाईलच बनून आवड तयार होईल …कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ? लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून जमणार नक्की …लाईक मिळणार नाही कशावरुन ? हे जमत नाही ते जमत नाही…सोड सांगणं( गाऱ्हाणं) […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन […]

ठेवावं  लांब लोका

ठेवावं  लांब लोका , भविष्य  सांगणाऱ्या बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /   गलका कसा बरे  हा ? भवताल भाटगाने हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /   आणील  आसमंता ,ठेवील या कराशी तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /   सारेच आनंदी  वातावरण भोवताली शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /   गझलेत ‘कौशला ‘ म्हणे हा मक्ताच झाला नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या — श्रीकांत पेटकर

1 232 233 234 235 236 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..