बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा […]
नाजूक, निर्लेप आणि निखळता ज्यांच्यात आहे अशी फुलं आणि हेवा, दावा, व्देष यापैंकी कोणताही रंग ज्यांच्यावर चढलेला नाही अशी मुलं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू…! कशा..! फुलं उमलतं, बहरतं आणि सुगंधतं. त्याच्या उमलणं स्वाभाविक असतं. आतून आलेलं असतं. कुणी त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, म्हणूनच ते प्रभावी असतं, परिणामकारक, आपलं करणारं असतं. मुलंही अशीच असतात. स्वच्छ […]
वर्ग भरला होता, गुरूजी मुलांना काहीतरी समजावत होते. वातावरण हलकं-फुलकं होतं. दोन दिवसावर प्रजासत्ताक दिन आला होता. त्यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्यांच्या गोष्टी गुरूजी मुलांना सांगत होते. मध्येच एका मुलाने ‘प्रजासत्ताक म्हणजे काय?’ असा प्रश्न गुरूजींना विचारला… गुरूजी हसले म्हणाले, ‘सोपं आहे, ज्या ठिकाणी प्रजेचं म्हणजे लोकांचं राज्य आहे, सत्ता आहे ते म्हणजे प्रजासत्ताक’ गुरूजींनी सोप्या शब्दात […]
ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय. ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!! […]
अनादीकालापासून आपण ऐकत आलोय, ते म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. कुणी सांगितलय हे. खरच सृष्टी बदललीय का हो? सूर्य आधी जसा उगवत होता, तसाच आजही उगवतो, मावळतो. चंद्राचे ही तसेच आहे. पृथ्वीचे फिरणे तसेच आहे, पाऊस येतो, उन्हाळा, हिवाळाही येतो. मग सृष्टी कशी बदलली. तिच्यात काही बदल झालेत हे जरी मान्य केले तरी त्यात मानवी […]
बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात. जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही. […]
अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. […]
शासकीय कार्यालयं. फायलींचा ढिग.. फायली अनेकांच्या आशा अपेक्षा कैद झालेल्या, कुणीची टेंडर गिळून बसलेल्या फायली, कुणाचे प्रमोशन थांबवून बसलेल्या फायली. कुणाची तक्रार घेऊन आलेल्या फायली. कुणाच्या अपेक्षांच्या निवेदनाने तयार झालेल्या फायली… एक ना अनेक विषय या फायलींत कैद झालेले असतात, आहेत. ऑन-लाईन आणि ई-टेंडरिंगच्या जमान्यातही फायली आहेतच की. कारण फायली असल्याशिवाय काम होत नाही, असा एक […]
सिअँटल एक मोठं शहर..समुद्रकिना-यावरचं…बेलेव्ह्यु सिअँटलचंच उपनगर…पण दोन्ही ठिकाणच्या चलनवलनात बराच फरक…अगदी पुण्याच्या गंज पेठेत आणि बाणेर -औंध मधे आहे तसाच… हिरव्यागार टेकड्या टेकड्यांवर वसलेलं…हे एक नितांत सुंदर टुमदार शहर….मोकळे ढाकळे रस्ते.. विकएंडमुळे रस्त्यांवर रहदारी कमी..सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या फोर्ट भागात असतं तसं… […]