‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी आॅर नाॅट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. […]
एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..! […]
एक गोष्ट मात्र नक्की ज्यांनी जाणीवपुर्वक दहशतीचा सामना केला, निडर मनाने दहशतीला जे सामोरे गेले त्यांनी इतिहास घडवला आहे. सामान्य माणुस इतिहास घडवू शकत नसला तरी तो निडरपणाने जगू शकतो, दहशतीचा सामना करून.. हे मात्र नक्की. […]
असं म्हणतात, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. तसे पहायला गेले तर कालचा दिवस आणि आजचा दिवस यात मोठा फरक तो काय? कालही सूर्य होता, चंद्र होता… तारे होते… रात्र होती, दिवस होता. काल जे होते तेच आजही आहेच ना? मग बदलले ते काय? जे काल होते तेच आज आहे, म्हटल्यावर मनात उत्साहाची कारंजी का फुलावी… नव्या दमाचा उत्साह शरीरात का यावा. […]
ही जेल इंग्रजांनी बांधली तेव्हा त्याची रचना “ऑक्टोपस” या समुद्र प्राण्यासारखा होती. “Central watch towar” आणि त्याला जोडल्या गेलेल्या सात तीन मजली इमारती ज्यामध्ये कैद्यांना एकांतवास देण्यासाठी बांधलेल्या कोठड्या. भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांनी चार इमारती नष्ट केल्याने आता तीनच इमारती अस्तिवात आहेत. “Central towar” वरून तीनही इमारतीवर लक्ष ठेवता येइल तसेच वेळप्रसंगी तीनही बिल्डींग “Central towar” पासून अलग करता येतील अशा पद्धतीने “Central towar’ चे बांधकाम आहे. त्यामुळे कमी रक्षकांनी ज्यास्तीत ज्यास्त कैद्यांवर लक्ष ठेवता येत असे. […]
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये सिंगापूरला मलेशियापासून स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचली व मनाने एकदम सिंगापूरमधल्या आठवणींमध्ये धाव घेतली. १८ वर्षे कशी वायुवेगाने पळाली ते कळलेच नाही पण असंख्य सुखद आठवणी मनात ठेऊन गेली. जगाच्या नकाशावर एकाद्या ठिपक्या एवढा छोटासा देश पण किती विविधतेने भरलेला आहे हे तिथे राहिल्याशिवाय समजत नाही. […]
अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत. […]
तो डबा घेऊन ऑफिसला गेला. मुलं आधीच school vanनी शाळेत पोहोचलेली. आता तिचा ‘personal time’ सुरु झाला. Coffeeचा मग एका हातात, नी तिचा favorite Android partner सोबत, अशी थोडी निवांत टेकली, तेवढ्यात दारावरची bell वाजली. थोड्या नाराजीनेच तिनेदार उघडलं; पण चेहेऱ्यावर लगेच आनंदाची लकेर झळकली! “अगं प्रिया! ये ना!” प्रियासुद्धा तिने दार उघडायची वाटच बघत होती. “अगं काय सांगू? आज मी कित्ती कित्ती आनंदात […]
पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो… अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? […]
रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा […]