इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !
पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.
[…]
