वार्धक्याविषयी बोलू काही…
जीवनातला शेवटचा टप्पा वार्धक्य. याची आखणी जर तरुणपणापासून व्यवस्थित केली तर हा अटळ प्रवास आनंदमयी होईल. आयुष्याचा आलेख पाहिला तर जन्मापासून पंचविशीपर्यंत चढण असते, पंचविशीनंतर तिशीपर्यंत सपाट पठार व तिशीनंतर घसरण सुरू होते, पण ती वर्षाला १ टक्का इतकी मंद असल्याने लक्षातही येत नाही. वार्धक्य लांब ठेवायचा हाच खरा काल. त्यावरच शास्त्रज्ञांनी आपले लक्ष केंद्रित केले. […]
