नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)

आजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं… […]

ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा

सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं. […]

मराठी वाड्मयातील चरित्रलेखन

गेल्या पन्नास वर्षांत समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध स्तरांवरच्या मान्यवरांची तसेच कार्यकत्यांची चरित्र लिहिली गेली. पण चरित्रकारांनी अभ्यासासाठी निवडलेले चरित्रनायक पाहता, अजूनही बरेचसे चरित्रनायक स्वांतत्र्यपूर्व काळातले असल्याचे दिसते. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात स्वकर्तृत्वाने विभिन्न क्षेत्रात कर्तृत्वाने समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तीही नव्या चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय केल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. चरित्रकारांच्याही पिढ्या बदलत गेल्याचा तो दृश्य वाङ्मयीन परिणाम होता. […]

बालनाट्याची पुढील दोन दशके(२००० ते २०२०) (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग४)

रत्नाकर मतकरी यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कामगार वर्गातील मुलांसाठी वंचित बाल नाट्य रंगभूमी सुरू करण्यात आली.बालनाट्य चळवळ तळागाळातील मुलापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ठाण्यातील काही निष्ठावंत रंगकर्मींनी बजावली. […]

ताण-तणावांचे विषाणू

ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

अंबाड्याची दोरी ना दोरखंड..!

आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे. […]

सामंजस्य

क्लास च्या आवारात राहणाऱ्या watchman च्या घरातून आवाज येत होता. त्याची बायको गरम गरम पोळ्या लाटत मुलांना जेवू घालत होती. महिला दिनाचं औचित्य आणि हे दृश्य , मगाशी जे अपुरं वाटलं ते इथे पूर्ण झालं..या सगळ्या सुद्धा कर्तबगार महिला नाहीत का? फक्त आता महिलांच्या या बाजूला कर्तबगारी म्हणून बघणं आपण सोडून दिलंय. […]

‘दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !

“इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं. […]

क्रांतीच्या खुणा

फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढचक्रांच्या विश्लेषणावरून काढलेल्या गणिती निष्कर्षाला, ऐतिहासिक आधार असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. यामुळे या संशोधकांनी वाढचक्रांतील धातूंच्या प्रमाणाची, हवामानाशी घातलेली गणिती सांगड योग्य ठरली आहे. वृक्षांच्या प्रत्येक वर्षीच्या वाढचक्राची, त्या वर्षीच्या हवेच्या दर्जाशी गणिती सांगड घालण्याचा असा प्रयत्न प्रथमच केला गेला आहे. फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलेल्या या मार्गामुळे, ज्या काळातल्या हवेतील प्रदूषणाच्या नोंदी उपलब्ध नाहीत, अशा काळातल्या हवेतील प्रदूषणाची माहिती मिळवणं, हे आता शक्य होणार आहे. […]

बालनाटयाची पुढील दोन दशके (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ३)

रत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली. […]

1 71 72 73 74 75 221
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..