नवीन लेखन...

शैक्षणिक

झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते. […]

पानी रे पानी तेरा रूप कैसा?

पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही. ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत. […]

गर्भ संस्कार

महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे. […]

सरोजिनीबाई…

बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. […]

प्रमाण परीक्षा

मला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची परीक्षा. त्यावेळच्या 12 वी च्या इंटर च्या परीक्षेच इतक वजन होत की आताच्या double graduate ला सुद्धा इतक महत्व नाही. पुढचे  शिक्षण घेण्यासाठी इंटर ची परीक्षा हीच एकमेव प्रमाण परीक्षा होती . इंटर ची परीक्षा पास झाला म्हणजे तो विद्यार्थी पुढचे […]

घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत

दही लावण्याची परंपरा आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आहे. पण बरेच वेळेला दही व्यवस्थित लागत नाही. त्यात पाणी व चोथा वेगळा होतो. अशावेळी दही कसे लागते व त्यासाठी कोणत्या परिस्थती अनुकूल व प्रतिकूल असतात याची आपण शास्त्रीय माहिती घेऊ. दही लागणे हे खालील गोष्टीवर अवलूंबून असते. […]

सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम

इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉल ची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉल च्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. […]

झोप का हवी

झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे. […]

कोरोना काळ व शिक्षण

करोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. या काळात जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं निर्माण झाली आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर नवनवीन पर्याय शोधण्याचा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी शिकू शकतील, प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना अजून करावा लागणार आहे. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १२

उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार? […]

1 94 95 96 97 98 167
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..