नवीन लेखन...

ताडोबात आठ पाणवठ्यावर सौर पाणपोई

उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे. उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे […]

बिरबलाच्या चातुर्यकथा – चंद्राची कोर आणि पौर्णिमेचा चंद्र

सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. […]

कळावे आणि लोळावे…

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो ‘कळावे’ पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा… १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे… २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे… ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी […]

पाऊले चालती .. एक जीवनानुभव

”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्‍याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या […]

किती इंधन फुकट घालवायचं ?

या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत. कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं… निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?

कंटाळा आला आता या टोलचा

खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा…

महाराष्ट्राची नवी टोल (धाड) संस्कृती

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि मुंबईतले ५५ पूल बांधल्यावर तिथे जो टोल नावाचा राक्षस ऊभा झाला तो त्यानंतर शांत झालाच नाही. आता महाराष्ट्रात टोल संस्कृती चांगलीच रुजलेय. कोणी कितीही ओरडलं तरी टोल बंद होण्याची शक्यताच नाही. नव्या सरकारला सहा महिन्यातच याची प्रचिती आली आणि आता तर त्याची कबुलीच सरकारने दिली. […]

निघाली घुमानची गाडी..

कदाचित पुढचं साहित्य संमेलन “फुकट” करुन घेण्यासाठी थेट “फुकेट”लाच ठेवतील. चला फुकटात फुकेत ची वारी करायला… […]

सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?

हे तर अगदी फारच झाले.. आता पुरे झाले यांचे लाड… सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ? ठाणे आणि पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनातून इतका पैसा उरला तो वापरा की. सुभाष जयवंत

1 104 105 106 107 108 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..