नवीन लेखन...

आठवणींच गाठोडं

आठवणींच गाठोडं
मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं
छोट्या अनुने हट्ट केला
तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं

अनु नेहमी हट्टानं विचारत
काय आहे पप्पा गाठोड्यात…?
मग मीही सगळ्या आठवणी
ओतायचो तिच्या पुढ्यात

आठवणी मग घेवून जात
तिला माझ्या भाव विश्वात
तिला गाढ झोपवुनच
परतायच्या त्या गाठोड्यात

वेळ आहे तिची आता
तिच्या विश्वात रमण्याची
सवय झालीय मला
गाठोडं उशाशी घेऊन झोपण्याची

जेव्हा अनु नसते घरी
गाठोड्याची गाठ सुटत नाही
आठवणींची घूसमट तेव्हा
माझ्याच्याने बघवत नाही

काल अनु आली होती घरी
अचानक तिला गाठोडं आठवलं
काढल मी बाहेर पटकन
अन् पुढ्यात तिच्या ठेवलं…

विचारलं तिला, माझ्या माघारी
गाठोड्याच काय होइल ग अनु ?
डोळ्यात पाणी तरळलं तिच्या
म्हणाली,
पप्या, नको ना रे असं म्हणु

डबडबलेले डोळे पुसले तिने
अन् गाठोडं उराशी आवळलं…
मला न विसरण्याच वचन ते
शब्दांविनाही मला कळलं.

– डॉ. सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..