नवीन लेखन...

अनपेक्षित (कथा – सांगोपांग : २)

आजची कथा : अनपेक्षित
पूर्व प्रसिद्धी : प्रपंच
दीपावली २०११

जी कथा लिहिताना , लिहिल्यानंतर आणि आजही वाचताना मी खूप अस्वस्थ होतो ती कथा म्हणजे अनपेक्षित.

काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रात एक बातमी छापून आली होती. दिल्लीत रस्त्यावर काही तरुणींनी स्लट वॉक काढला होता. म्हणजे अर्धनग्न होऊन बेशरमी मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वेळीच धावपळ करून तो थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता.

हे असले मोर्चे हे परदेशातील फॅड . अमेरिका , स्वीडन , साऊथ आफ्रिका , कॅनडा येथे असले मोर्चे निघाल्याची नोंद आहे. पण भारतात निघालेला तो एकमेव मोर्चा होता आणि त्याला कारण काय होतं तर , टोरांटो मध्ये कुठलातरी एक पोलीस अधिकारी म्हणाला होता , ‘ बायका उत्तान कपडे घालतात म्हणून त्या बलात्काराच्या शिकार होतात . ‘

त्याला तिथल्या जनतेनं उत्तर दिलं होतं . पण त्याचा भारतातल्या परिस्थितीशी काही संबंध नव्हता किंवा इथे मोर्चा काढण्याचा संबंध नव्हता. पण फेमिनिझम च्या चुकीच्या कल्पनांनी भारलेली काही मंडळी भारतात आहेत , त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या अनावर , अगोचर कल्पना राबवण्यात त्यांना जास्तच रस असतो. त्याचा इथल्या तरुण पिढीवर काय परिणाम होईल याची त्यांना फिकीर नसते किंवा भारतीय कुटुंब संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो , याची जाणीव नसते. मोबाईलच्या आहारी गेलेली , व्यसनाधिनतेत गुंतलेली आणि त्यामुळे सारासार विचारशक्ती गमावून बसलेली तरुण पिढी कुठे जाणार आहे , याचा विचार कुटुंब संस्थेनं करायला हवा असं मला ती बातमी वाचून वाटू लागलं आणि आकाराला आली अनपेक्षित ही कथा.परिणाम तीव्र व्हायला हवा म्हणून मी थोडं अधिक लेखन स्वातंत्र्य घेतलं आणि कथा लिहिली .

कथेमध्ये असा मोर्चा निघतो . त्यात अगदी अल्प वस्त्र घालून , तरुणी सहभागी होतात . मीडिया लाईव्ह सगळं दाखवू लागतो . टीआरपी वाढण्यासाठी क्लोजप शॉट चा भडिमार सुरू होतो .अखेर मोर्चा पोलीस अडवतात . सगळ्यांना अटक होते आणि सगळ्या तरुणींना माणुसकीच्या नात्यातून गुन्हा दाखल न करता, त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले जाते .

कथा इतकीच आहे. पण त्यात कंगोरे अनेक आहेत .

अनन्या हे नायिकेचं नाव. घरात आणि घराबाहेर प्रचंड स्वातंत्र्य मिळाल्याने शेफारून गेलेली , मोबाईलवर सतत पडीक असलेली , सनसनाटी प्रसिद्धीसाठी हपापलेली , घरातल्यांना धुत्कारून लावणारी , मित्रमैत्रिणी , पार्ट्या , डिस्कोथेक , रेव्ह पार्टी , क्लब्ज मध्येच रमणारी. फॅशनचा जबरदस्त मोह असलेली आणि त्यापायी काय काय गमावतो आहोत याचं भान नसलेली .साहजिकच ती या बेशरमी अर्धनग्न मोर्चात अग्रभागी झळकणारी.

भार्गवी ही तिची आई. अनिकेत हे तिचे वडील आणि अपूर्व हा तिचा लहान भाऊ. मोर्चातल्या तिच्या अर्धनग्न दिसण्याने , क्लोजअपच्या अतिरेकाने या तिघांचे भावविश्व हादरून गेले आहे. तिच्या बेधुंद वागण्याला आपण जबाबदार आहोत या जाणिवेनं शरमून गेलेले आईवडील अस्वस्थ होऊन मान खाली घालून ऑफिसातून , शाळेतून परत येत आहेत. येता येता ऐकाव्या लागणाऱ्या अश्लील कॉमेंट्स मुळे त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले आहे. लहानग्या अपूर्वला काहीतरी भयंकर वाटत आहे. तो अबोल होऊन बसला आहे.शेवटी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तिथला इन्स्पेक्टर त्यांना बरंच काही सुनवतो आणि एक प्रश्न विचारतो.

‘ अनिकेतजी , हा मोर्चा , त्याची क्लिपिंग हे सगळं मीडियावर , फेसबुकवर आणि कुठे कुठे गेलं आहे नक्की , मग आता तिचं लग्न कसं ठरवणार ? तिच्या भविष्याचा काही विचार केलाय ? ‘

असं काही आपल्या आयुष्यात घडेल अशी कल्पनासुद्धा अनिकेतनं केलेली नसल्यानं तो केवळ परिणामांच्या कल्पनेनं हादरतो आणि घरी येतो. पोलिसांनी डोक्यात सोडलेल्या भुंग्यानं तो कोलमडतो , भार्गवी कोलमडते. पुढे काय या चिंतेत असताना फोन वाजतो. फोन अनन्याचा असतो. फोनवरच ती सांगते;

‘ मघाशी पोलिसांनी तुम्हाला विचारलेला प्रश्न मी ऐकलाय . पण तुम्ही दोघांनी कसलीही काळजी करू नका . मी लग्न ठरवलंय . ज्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर मी आलेय , तिच्याबरोबर मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार आहे . कदाचित आम्ही दोघी नंतर लग्नसुद्धा करू . डोन्टवरी ! ‘

अनन्याचं फोनवरचं बोलणं ऐकून दोघांची शुद्ध हरपते आणि अनपेक्षित वळणावर कथा संपते .

ही माझीच कथा वाचताना मी आजही अस्वस्थ होतो .समाजातील अशा प्रकारच्या वृत्ती असणाऱ्यांच्या भविष्यकाळाच्या जाणिवेनं मन सुन्न होतं.
आणि ते स्वाभाविकच आहे , नाही का ?
तुम्हाला काय वाटत ?
कळवा मला .

प्रतिसाद अपेक्षित आहे .

आणि हो ,
या कथेतील घटना वास्तवातील असली तरी पात्रं , प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत .

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..