नवीन लेखन...

आहारातील बदल – भाग १

 

आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?

कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.

वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.

आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.

आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.

सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.

अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !

म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.

आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !

दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.

परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.

22.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..