नक्षलविरोधी लढय़ामध्ये राजकीय बेजबाबदारी, विविध पातळ्यांवरील धोरणात्मक विसंवाद दूर करणे जरुरी
देशाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक धोका नक्षलवाद्यांकडून असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हणूनच म्हटले आहे. मात्र, नक्षलवादाचा हा प्रश्न सोडविण्याचा मुद्दा त्यांनी बहुधा, निवडणुकीनंतर येणार्या पुढील सरकारवर सोडला असावा.छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा पुरता बीमोड करण्यासाठी तेथे ऑपरेशन ‘ग्रीन हंट’ पुन्हा नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
[…]
