नवीन लेखन...

लोकशाही का बालूशाही ?

आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती.नुसती चेंगराचेंगरी…
तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह आणि आमचा दादा…म्हणजे माझा चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय. गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं.
तो भेटला. जरा गडी घरबडीत दिसतं व्हता.केस वाढलेले…दाढी वाढलेली…काळी पांढरी…खूटं.खूट भी लयं निबराट. लयं विद्रूप दिसतं व्हता.बरं कपडे भी धड नव्हतं त्याची.लयंच बेसूर दिसतं होता.
पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी.
“राम राम सायब…”
“काय शामा काका ….कुणीकडे इकडं?”
“आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाहीय व्हयं माहीती?”
“…नाय बुवा.काय झालय?”
“तेच..ते..इलेक्शनचा राडा.”
“इलेकशनचा राडा…कसला…?”
“निल्या टाकलायना आत …”
“आत..निल्या..?”
“पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच.”
“पण कमून…?”
“दुसरं काय राजकारणच.”
“आर,राजकारणचा तुझा काय सबंध ?”
“कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं राजे माग फिरतं ना. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी…दुसरं काय आपलं.तुम्हाला माहीत नाय आपून कसलं सरळ माणूस हाय ते”
“आत्ता हे राज कोणतं बुवा…?” मला राजे कोणते ? हा भाबडा प्रश्न पडला.
“ते…निखीलराजे कसबे पाटील…पाटल्याचा नातू…प्रतापरावचं पोरगं..?”
“प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?”
“तेच..ते…लयं बेस्ट गडी…हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं मागय तेच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय.”
“मग…? मोठी माणसं ती बब्बा”
“मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर… त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली.त्यांच झालं राजकारण.खात्या ताटावरणं पोरं उच्चालीत.लयं पोरं पिसल्लीत….पोलसाडचं ती!त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसती आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय.”
“मग ते राज नाय काय सोडीत?”
“त्यांच्या कडचं आल्लतो बंगल्यावर.सुटत्यालं म्हणतेतं…पाच सहा दिवसात.सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? सुटलं तरी बोंबलतं फिरत्यालं उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा”.
“मरा की गप्प…राजे म्हणतेय म्हणल्यावर…”
“मी गप्पच मरनं पण निल्याची आय दम खातीयं व्हयं.?
ते तर येडचं.हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ?राजकारणात अशा कुरघोडया….डाव असत्यातचं.
तस्स त्याला काय कमी…?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून…”
“मग काय…सुटलचं ना …आज उदया…करतेलं जामिन.सारं…मॅनेज करतेलं.सत्ता…पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?.”
” त्यांचं काय करायचं….आपल्याकडं काय? आपली खायची पंच्चाचाईत.बीडला यायचं तर चार पाच जणाजवळ थोबाड वाजया लागलं.सायब गरीबाची लयं लोक पोथी वळखत्यात.मी कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली.असली पोरं मेलेली बर.”त्याचा घसा पार घोगरा झाला व्हता.
” असं त्रागा नका करू. सुटलं…होत असतं. समोरचं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी.”
“ते टेलर तसचं म्हणत व्हतं ”
“कस्स?”
“आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू…. काॅप्रमाईज काय ते झालयं जनू.”
“झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं.”
“कसला इकास अन् बिकास.वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय.”
“असं कसं म्हणतोस…आर ते पक्षच वेगळे.”
“मलात काय भी कळत नाय.टकल्यानी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं
झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू ”
“मग..निल्या का म्हणतोय आता.?”
“ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं.”
“असं म्हणतयं ?मग ….कळतय की नाय? ”
“नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरू आणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय.”
“मग जाऊ दया…. नाय मेळ तर नाय.”
“आता हे झालं माझ…पण निल्याची आय.दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं .मवा निल्या..मवा निल्या .. ”
“काका.आईचं ह्रदय ते.तडफडणाराचं ”
“आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय? माझ्या तरी हातात काय?”
“सुटलं नव्हयं पोरगं?”
“सुटलं…. आता आपली पोरं आतमधीत कोणं ठेवतंयं त्यांना काय राजकारण करायचं नाय काय?”
“ते टेलरं म्हणतं होतं.ते पहिलचं एक होतं.आता नसत्येतं पैरं सुटतं”
“असं कसं व्हयीलं?
“एक झालेत म्हणल्यावर….कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं.दोघांनी मिळून काढू नाही कुसूर.”
“पोरांनी काय केलयं. कायदे बिद हायतं का नाय ? आरं लोकशाही ही..”
” आसली कसली लोकशाही.आरं ही तर बालूशाही आसलं.समदे कशी वाटून खात्यात.
” आरं शामा काका तसचं झाल्लयं गड़या.लोकशाही का बालू शाही काय भी कळतय नाय.सुटतीलं पोरं.सत्य अजून मेल नाय.”
“आपलं नाय शहाणं … ते घाबडं म्हणतयं.आसचं जॅल्लात राहिल्यावर फार्म मधी येतं माणूसं.याल्लाचं पुढारी व्हायचं. दुस-यावर कशाला टेपूरा.”
शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.
“येतो …गाडी लागली आसलं.” माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही.
अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास….तर.आपण पहातोच अहोत की….सत्तेसाठी काय पण…
हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं?
सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर …. ? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं?
बरं.हे कुठं ग्राप….पस…जिपला झालं तरी समजू शकतं.पण
डायरेक्ट विधानसभेतचं… अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर….लोकशाहीचं काय ? हे सारेचं लोकशाहीला बालूशाही सारखं खातात.
आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर…
चेल्यांनी…पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड… त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ?
निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार?
तिनं आपल्या पोराचं आयुष्य…भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं.
असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं
जॅम टेन्शन आलं बुवा…!

— परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
9673400928

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..