नवीन लेखन...

‘देऊळ बंद’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक प्रणित कुलकर्णी

‘देऊळ बंद’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक प्रणित कुलकर्णी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी पुणे येथे झाला.

पुण्यातील फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही मालिकेचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. तसेच लोकप्रिय झालेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचंही लेखन केले आहे. गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केले आहे. प्रवीण तरडे व प्रणित हे दोघं खूप वर्षापासूनचे मित्र आहेत. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते. देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव, आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हबीर तु खंबीर तु अशी अनेक सुपरहिट गाणी लिहिली होती. शिवबा ते शिवराय या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. त्यांनी जीवन यांना कळले हो या स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शन केलंय. तसेच “सुरक्षित अंतर ठेवा” या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. प्रणित कुलकर्णी ‘सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांच्या पुनर्भेटीला आले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला होता.

प्रणित कुलकर्णी यांचे निधन १७ मे २०२१ रोजी झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..