नवीन लेखन...

वातावरणाची निर्मिती

वातावरण ते निर्मित होते,  जसे जातां वागूनी

हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी…१,

फिरत असती वलये तेथें,  सारी अंवती भंवती

चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२,

जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी

चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३,

जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती,  आपल्या शेजारूनी

चलबिचल ते मन होते,  केवळ सानिध्यानी…..४,

याच लहरी घुसुनी शरिरी, मनी आघांत करती

मनामध्ये तो बदल करूनी, तीच वृत्ती बनविती…५,

विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे

कसे टिकेल तन मन तेथे,  नाजूक जे असते…६

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..