नवीन लेखन...

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते
कुणास ठाऊक काहीच कळत नाही
सजवलेली शय्या, ताटी का होते
कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥

मनातले उमटत नाही
कुणास ठाऊक का म्हणून
सुटा पसारा जुळतच नाही
कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥

वेड्यागत हव्यास का हा
सामान्यतेहून दूर जाण्याचा
धडपडूनही जेव्हा फसतो
प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥

कोरडे अश्रू, ओले शब्द
का एकमेकात मिसळत नाहीत
एकमेकांत गुंतलेली जाळी
भावनांची सुटत नाहीत ॥ ४ ॥

जनावराकडून जनावराकडे
मार्ग वाटोळा चक्राचा
कुणामागे कुणी धावावे
प्रश्न आहे का सुटण्याचा ॥ ५

कुणाचे मरण का असावे
लक्ष्य एखाद्या आयुष्याचे
एकमेका छेदण्याचे
ध्येय का हे जीवनाचे ॥ ६ ॥

माणुसकीला माणसानेच
का लाजावे कळत नाही
प्रयत्नांतीही औषधाला
‘माणूस’ तेव्हा मिळत नाही ॥ ७ ॥

अंधारात विरलेला असतो
अर्थ माणूस या शब्दाचा
शोधूनही सापडत नसतो
मार्ग माझ्या जीवनाचा ॥ ८ ॥

अगतिक होतो दीनवाणा मी
माझ्यासोबत माझी विफलता
सरपटत येते हळू अचानक
ग्रासून टाके अपूर्णता ॥ ९ ॥

— यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..