नवीन लेखन...

तो पुन्हा आलाय

तो पुन्हा आलाय
पण तो गडबडलाय
आणि गोंधळलाय
थोडासा हिरमुसलाय

त्याच्या स्वागताची तयारी नाही
उत्साह तर कुठेच दिसत नाही
उत्सवी वातावरण नाही
कसलीच लगबग नाही

नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची
सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची
महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची
बालगोपाळांना मोदक पटकावण्याची

कलात्मक आरासी केल्या जातात
पानाफुलांनी मखरं सजवली जातात
घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात
दहा रात्री देखील जागवल्या जातात

पण या वर्षी असं काहीच नाही होणार
न भुतो न भविष्यती असंच घडणार
त्याचा विरस होणार
आणि तो निघून जाणार

तो जाण्यापुर्वी त्याला वचन देऊ
पुढच्या वर्षी सगळं नीट करू
नेहमीसारखंच तुझं स्वागत करू
या वर्षीचं उट्टं भरून काढू

— शरद दिवेकर
कल्याण
70457 30570

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..