नवीन लेखन...

ती आल्यावर

ती आल्यावर

बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर

मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर

मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर

पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर

किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर

मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर

ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर

© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

Avatar
About Jaywant Bhaurao Wankhade 13 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..