नवीन लेखन...

ते बावन्न तास…

सुटलो. एक प्रचंड मोठं टेन्शन गेलं. सॉलिड वांधे झाले होते. डोक्याचा भुगा झाला होता आणि रिकाम्या मनाला भुंगा कुरतडू लागला होता. कोळ्याने दोन्ही डोळ्यांना कोळीष्टकं बांधायला सुरुवात केली होती .

झालं होतं काय की आमच्यावरच्या अलोट प्रेमानं , वीस पंचवीस इतक्या विपुल संख्येनं समस्त रत्नागिरीतील वानरदळ आमच्या आवारात सुखेनैव बागडण्यासाठी आलं होतं. आम्ही ( मी आणि माझी सौभाग्यवती ) नेहमीप्रमाणे त्यांचा मुक्त संचार अनिमिष नेत्रांनी पाहत होतो. झाडांवरून घरावर , घरावरून पुन्हा झाडांवर , लांब आणि उंच उड्यांचे स्टंट पाहत होतो. मुलांसाठी राखून ठेवलेले चिकू , भाजीसाठी लावलेल्या नीरफणसाची लहान लहान फळं , देवाला आवडतात म्हणून मुद्दाम जोपासलेल्या लाल जास्वंदीचे कळे या सगळ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन झाल्यावर उर्वरित चिकू , फळं , फुलं कुस्करून रांगोळी घालण्यासाठी त्यांनी पसरून ठेवली. दरम्यान वीस बावीस कुत्र्यांची तगडी फौज जमिनीवरून त्यांच्याशी युद्ध करायला बघत होती. त्यानादात कुंड्या , बागेत जोपासलेली विविध झाडं यांची मोडतोड करून सगळ्या परिसराला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. कुत्र्यांच्या भुंकण्याला साथ देण्यासाठी , बंगल्याच्या गच्चीवर घातलेल्या पत्र्यावर उड्या मारून वानरदळ युद्धाचे पडघम , रणभेरी वाजवित होते आणि चेकाळताना दिसत होते. दरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. पण कुत्री आणि वानर यांना भान नव्हते.

इतक्यात जोरदार आवाज झाला आणि डिश अँटिनावरून जोरदार उड्या मारल्यानं डिशनं मान टाकली आणि आमचा टीव्ही , ‘ नॉट रिसीव्हिंग सिग्नल ‘ असं बोंबलून सांगू लागला आणि तब्बल बावन्न तास टीव्ही हेच बोंबलत होता. मेकॅनिक येईपर्यंत!

बावन्न तासांनी टीव्ही नीट बोलू लागला .

तोपर्यंत .. दीपिकाचं काय झालं असेल , रियाला जेवण कसलं मिळालं असेल , सलमान , करण , शाहरुख आणि इतर नट नट्या यांचं आर्थिक नुकसान किती झालं असेल , ड्रग पेडलर बिच्चारे काय करत असतील , मुंबईचं व्हेनिस झाल्यावर पर्यटनाला संधी कशी असेल, तुरुंगातील कैद्यांना कोरोना झाल्यामुळं बिचाऱ्या कैद्यांना काय वाटत असेल , पळत रिपोर्टिंग करणारे कसं रिपोर्टिंग करीत असतील , नवीन जाहिराती किती आल्या असतील , कोण कुणाला उखडून टाकत असेल , अशा असंख्य प्रश्नांनी डोक्याला भुंगा लागला होता. कारण टीव्ही दिसत नव्हता ना. पण बावन्न तासांनी टीव्ही सुरू झाला एकदाचा आणि सुटलो.

त्या बावन्न तासात न पाहिलेली आणि तुंबलेली मुंबई बघू शकत होतो. चर्चांचा निरर्थक काथ्याकूट बघू शकत होतो.
बबड्या आता काय करील याची शक्यता व्यक्त करू शकत होतो. राधिकेच्या पहिल्या नवऱ्याच्या चारपाच बायका आता काय करणार याची चिंता करू शकत होतो आणि काय काय …

जाऊ दे. आता टीव्ही लागलाय , तर तोच पाहतो ना. ते बावन्न तास कसे घालवले असतील माझं मलाच ठाऊक. आता पुन्हा वानरसेना येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत , तोपर्यंत टिव्हीकडे बघत राहतो.

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

हे काल्पनिक नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..