नवीन लेखन...

अस्सल नाट्यधर्मी वि. रा. परांजपे

वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती. […]

नाट्यभूमीचा मुसाफिर : डॉ. मुरलीधर गोडे

ठाण्याच्या धुळीधुळीच्या कणाकणांत नाटक सामावलेले आहे. त्यामुळे ठाण्यात जन्मलेल्या मुरलीधर गोडे यांच्या नाकातोंडात हे नाटकाचे धूलिकण न घुसते तरच नवल! त्यांचे शालेय जीवन महाडच्या परांजपे विद्यामंदिरात गेले. विद्यार्थी असताना मो. ग. रांगणेकरांच्या ‘आशीर्वाद’ व ‘माझे घर’ या नाटकात आणि ‘ध चा मा’ या ऐतिहासिक नाटकात अभिनय करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. एम.ए., बी.एड्. झाल्यानंतर १९६३ पासून […]

पहिले बालनाट्य संमेलन

ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी […]

सुरेल आवाज आणि सहज अभिनय

आपल्या सुमधुर गळ्याने आणि तितक्याच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून ठाण्याचे नाव संगीत रंगभूमीच्या प्रवाहात उजळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुवंती दांडेकर. पुण्याला सहस्रबुद्धेंच्या घरी जन्मलेल्या मधुवंतीला गायनाचा वारसा मिळाला तो आई मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून. आईच्या गळ्यातले गाणे लेकीच्या गळ्यात निसर्गदत्तपणे आले आणि मराठी नाट्यसंगीताच्या मैफिलीत एक कसदार सूर दाखल झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मधुवंतीचे शास्त्रीय संगीताचे […]

पडद्यामागचे ठाणेकर

नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही […]

ठाण्यातील नाटककार

दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयातून रंगमंचावर साकारले जाणारे नाटक सर्वात आधी उमटते ते नाटककाराच्या मनात. कधी एखादी सामाजिक समस्या कधी कुठली राजकीय बातमी, कधी चक्क पुराणकथा, कधी मनात उमटणारे भावनांचे संदर्भहीन तरंग, कशामुळे नाटककाराच्या मनात नाटकाची ठिणगी पडेल सांगता येत नाही. पण ही ठिणगीच नंतर प्रेक्षकांच्या मनात विचारांची ज्वाला पेटवते. नाटक हे जसं करमणुकीचं साधन आहे, तसंच […]

कलासरगम – एक स्वगत

कलासरगम ही ठाण्यातील सांस्कृतिक नाट्यचळवळ घडवणारी हौशी नाट्यसंस्था. या संस्थेने आम्हाला काय दिलं? सांगू… ‘शून्यातून विश्व कसं उभं करायचं’ ते या संस्थेने शिकवलं. झिरो balance असताना गणेशोत्सवात १० x १० च्या स्टेजवर श्याम फडके, बबन प्रभू, वसंत सबनीस इत्यादी विनोदी लेखकांची तीन अंकी नाटके बसवून दहा दिवस ट्रेन, एसटीने किंवा टेम्पोने (boxset) प्रवास करून ठिकठिकाणी साखर […]

आणि मी नाटककार झालो

‘कलासरगम’ नाट्यसंस्थेसाठी त्यांना राज्य नाट्यस्पर्धेत नाटक करायचं होतं. ठाणे नगर वाचन मंदिर येथे पी. सावळाराम आणि म. पां. भावे यांचा कार्यक्रम होणार होता. तो ऐकण्यासाठी मी जाणार असल्याचे विश्वासला समजलं. तो आणि विजय जोशी (दिग्दर्शक), जे आता सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, असे दोघं मिळून मला भेटायला म्हणून वाचन मंदिरात मागे हातात बाड घेऊन बसले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मला गाठलं आणि विचारलं, ‘तुमच्याशी बोलायचं होतं.’ […]

लोकरंगभूमीचे साक्षेपी संशोधक: डॉ. प्रकाश खांडगे

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे डॉ. खांडगे गेली बारा वर्षे शिकवत आहेत. पीएच.डी.चे मार्गदर्शन असलेल्या डॉ. खांडगेंच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी संशोधन करत आहेत.‘खंडोबाचं जागरण’ या पुस्तकासाठी त्यांना 2010चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथांचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. या खेरीज शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कलादान पुरस्कार मिळवलेल्या डॉ. खांडगेंनी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010मध्ये त्यांनी चीनमधील बीजिंग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोकसंगीतावर निबंध सादर केला तर याचवर्षी अमेरिकेतील नॅशव्हिला येथे आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोकसंस्कृती परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोककलांवर निबंध सादर केला. […]

ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील माझे योगदान

गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..