नवीन लेखन...

शुष्क व्यवहारी भावना

या जगी कलियुगी संसारात
जगणे झाले केवळ व्यवहारी
जाणिवा , भावनांच्या शुष्क
ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..।।१

आस्था , जिव्हाळा हरविला
जो , तो स्वस्वार्थातची रमला
मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे
प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..।।२

मने गोठलेली , रक्तही गोठलेले
सत्य ! धनदौलत ,भौतिकसुख
क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे
जगणे जाहले सारेच व्यवहारी..।।३

केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे
विवेकी , सद्गुणी , सात्विकता
संस्कार निष्फळ , या कलियुगी
जगणे स्वार्थी , जाहले व्यवहारी..।।४

निस्वार्थी प्रेमास्था कुठे शोधावी
शब्द ,स्पर्श, हास्य सारेच बेगडी
शाश्वत मैत्रभावही आज दुर्मिळ
मुसमुसती अंतरी , स्पंदने बावरी..।।५

©️वि.ग.सातपुते.(भावकवी)
? ( 9766544908 )

*रचना क्र. ७५ / ११ – ६ – २०२१*

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..