नवीन लेखन...

श्रीमुद्गलपुराण – ५

श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत.

कोणत्या तरी देवते पासून किंवा ऋषींपासून हे राक्षस जन्माला येतात. बालपणी श्रीगुरूंचा सांगण्यावरून अत्यंत घोर तपश्चर्या करतात. सर्वप्रथम तर मृत्यू नसावा असेच मागणे मागतात. तसा वर मिळणे शक्य नाही म्हटल्यावर तो मृत्यू जितका जमेल तितका कठीण करण्याचा प्रयत्न करतात.

असे वरदान मिळाले की जवळजवळ आपण अमरच आहोत असे समजून संपूर्ण त्रैलोक्याला छळतात.

त्यांच्या त्रासाने वनवासी झालेले देव त्याच्या मृत्यूसाठी मार्ग शोधतात. त्यावेळी त्यांना कोणीतरी गुरु श्री गणेश उपासनेचा मार्ग सांगतात.

देवतांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान गणेश अवतार घेतात.

राक्षसाचे सर्व सैन्य इत्यादी मारले जाते. शेवटी राक्षसाला भगवान आपल्या परब्रह्म परमात्म रूपाची जाणीव करून देतात . शेवटी दैत्य शरण येतो.

आठही कथा आलटून-पालटून अशाच आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की आठ सांगण्याची आवश्यकता काय? तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार सारख्याच कथा सांगितल्याने लक्ष कथेवरून कथनीयाकडे जाते. पुराणात कथा वर्णिलेल्या असतात कारण कथा लक्षात राहायला सोप्या असतात. पण कथाकारांना कथा सांगायच्या नाही आहेत. त्यांना सांगायचे आहे तत्त्वज्ञानच. पण शुद्ध तत्त्वज्ञान केवळ वेदांत सहज कळत नाही म्हणून तो कथांच्या रूपात मांडला जातो.

देवता स्वर्गात असतात अर्थात सुखात असतात त्या वेळा भगवत् भक्ती विसरतात. त्यावेळी त्यांच्यातही भोगवादी विचार प्रबळ होतात. विकार बळावतात.

अशा वेळी भगवान राक्षसाच्या रूपात शक्ती उभा करतात. देवतांची सत्ता गेली की मग त्यांना भक्तीचे महत्त्व लक्षात. ते पुन्हा तपश्चर्या करतात आणि त्यांची सुखे त्यांना पुन्हा भगवान मिळवून देतात. ही कथा त्या देवांसाठी नाहीतर आपल्याला दिलेला हा उपदेश असतो की सुखामध्ये भगवंताचे भजन सोडू नये अन्यथा दुःख वाट्याला आल्या शिवाय राहत नाही.

— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..