नवीन लेखन...

स्नेहमेळावा – ४७ वर्षांनंतर !

” वंदे जननी, भारत धरणी
सस्य श्यामला प्यारी ”

४७ वर्षांनी हे शालागीत एकस्वरात म्हणण्याचा थरार कसा असेल? तेही बालपणीच्या तुकडीत उभे राहून-हात जोडलेले, डोळे मिटलेले! त्यानंतर ठणठणीत घंटा !!

सुधीर मोघेंच्या गीताच्या ओळी –
” एकाच या जन्मी जणू , फिरुनी नवी जन्मेन मी ! ”

खऱ्या अर्थाने लागू पडतात शाळा-महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यांना ! आजपर्यंत भुसावळ, सोलापूर मधील शाळेच्या आणि सांगलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मिळून किमान १५ स्नेहमेळाव्यानंतर दरवेळी मी सुधीर मोघेंच्या या ओळींनुसार फिरुनी नवीन जन्मलोय.

ज्यांनी वर्गात शिकविण्या बरोबरच बाह्य जगात जगण्याच्या जाणिवा जागृत केल्या आहेत अशा गुरुजनांचा आजही लाभणारा सहवास, त्यांची आस्था आणि प्रेम अशावेळी टॉनिक असते. एक काळाचा एकसंध तुकडा वाटून घेतलेले मित्र सर्व विसरायला लावणारे असतात.

शाळेची दुरावस्था खिन्न करणारी असते-पण ते क्षणिक. कारण दुरावस्था इमारती, फर्निचरची होत असते – अपरिहार्य निसर्ग नियमानुसार पण संस्था वाढत्या वयानुसार तितकीच प्रगल्भ, समंजस होत जाते. काळाचे वेढे कोणाला चुकले आहेत- शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या एकत्रित घालविलेल्या कालखंडाला?

पण आठवणींना वय नसते. त्या ४७ वर्षांनीही ताज्या टवटवीत असतात आणि मनामनांमधे जिवंत असतात.

फक्त त्या निखाऱ्यांवर साठलेली राख फुंकणीने फुंकर मारून झटकली की सहवासांचे निखारे धडाडून प्रज्वलित होतात. मधल्या काळाच्या पाटीला पुसून टाकतात. स्नेहमेळावे म्हणजे अशी फुंकणी असते- निखाऱ्यांना रसरशीत करणारी.

शाळेत आपल्या स्मृती जपलेल्या असतात- Souvenir of my school life या काव्यरूप नांवाने ! असाच एक शाळेने जपून ठेवलेला तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचा
७२-७३ चा फोटो हाती लागला-आम्हांला घडविणाऱ्यांचा !

फिरुनी नवा जन्म झाला !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..