नवीन लेखन...

सह्याद्री पुन्हा गहिवरणार

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन..

माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो… काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा….

चिरून तो काळाचा पदडा
सह्याद्री पुन्हा गहीवरणार
जाणता राजा शिवछत्रपती
अवतार विलीन तो होणार…

केले उभे हे स्वराज्य त्यांनी
लेक जिजाऊ मातेचा तो असा..
मुघली शासन मोडीत धरी
झुंजे वाघ सह्याद्रीचा तो असा..

नथ मस्थक झाली ती युगे
अखंड स्वराज्य श्रीची रे ईच्छा..
हाती धरून एक एक मावळा
केली स्वराज्याची पुर्ण ईच्छा..

सह्याद्री चौफेर पराक्रम त्याचा
दुमदुमली मराठी माती अशी
गड ,बुरुज देहहरवून देई लढा
बलिदानी लाल झाली माती अशी..

चरित्र शिवाजीचे ऐकता
चैतन्य प्रत्येक रे मनी पेटे..
धकधक करुनी धमण्या
अस्मिता ह्दयी, ती दहक पेटे..

असा वाघ जेव्हा गडबडला
काळाचा ओघ तो जणू चढला
अचानक रोग रुपी शुत्रूचा
नकळत हल्ला देवाला अडला..

ओठी एक नाव ते शुंभू शुंभू
एक बाप असा व्याकूळ झाला..
भेद काळाचा नाही कधी कळला
माझ्या राजाचा प्राण आडकला..

शुंभू राजे होते तेव्हा पन्हाळी
रायगडाला लागली हो जिव्हाळी
राजघराण्यातील सगळे दु:खी
राज्य कारभाऱ्याच्या देव जाप मुखी..

लागे मनी चाहूल शुंभू राजास
मन बोले, देई हाक पित्यास..
अस्वस्थ झाले पुत्र युवराज
कुठे काही घडतं ?.. काय ते राज .?

चाले प्रयत्न शरर्थीचे , वैद्य लढे
एक एक अनुभव आज मागेपढे
नाही असर होई जेव्हा ती दवा
सगळ्यांनी मग मागितली दुवा…

नाही कामी आली दवा, दुवा
स्वराज्याचा प्राण तो हरवला
खेळी आज काळाची ही अशी
माझा जाणता राजा हरवला….

उमाकांत कळे
अकोला
९९२२८५५५३९
http://umakantk.blogspot.com

“आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..