नवीन लेखन...

ऋतुगंध

तुझं अवेळी कोसळणं भावतं मला
भावनांचे उद्रेक झेलतानांही शांत असतोस
माझा पाऊस नसतोच असा..
उन्मुक्त ,अव्यक्तच रहाणारा
बेभान होणं जमत नाही तुला..
अनावरतेचा मखमली साज ही पेलत नाही तुला
नागचाफ्यांतला गंध श्वासांत भरून रहातो..
शुभ्रमौतिकांचे सडे सांडत येणारी
प्रत्येक ओळ मी
गिरवत रहाते माझ्या तळहातावर..
प्रतिबिंबातला अनोळखी होत जाणारा
शहारा सरसरत रहातो शरीरभर…
अंगभर लपेटून घेते
इवल्या सोनचाफ्याचा बहर
केशर माखल्या ऋजुतेची ग्वाही..
क्षणभरच ओझरती ठेवत
तू तुझा पाऊस मिटून घेतोस
सैंरध्रींचा मखमली साज
ओघळत रहातो अनावर…

© लीना राजीव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..