नवीन लेखन...

रात्र…चिरःकाल टिकणारी 

लहानपणी रात्र कशी
अगदी लवकर यायची
थकलेल्या मला कशी
पटकन निजवायची.

कळु लागले तशी
रात्र ही शांत झाली
तिला मला जणु
स्वतःची ओळख मिळाली.

तरूण झालो तेंव्हा
रात्र कशी रोमांचित होई
रातराणीच्या वासानं
ती धुंद होउन गाई.

संसाराच्या धावपळीत
चैन रात्रीची हरपली
काळजीने ग्रस्त रात्र
उशीराने झोपू लागली.

स्वप्नाळु रात्र फार काळ
नाही स्वप्नात रमली
वास्तवाच्या जाणीवेने
दचकून वारंवार उठली.

कोसळण्याऱ्या दूःखानी 

रात्र जरी पूरती भिजली
मायेची चादर घेऊन
मला गुरफटून झोपली.

कधी रात्र विनाकारण
माझी चिंता करते
मलाही नाही झोपू देत
आणि स्वतः उगाच जागते.

आजकाल रात्र पूर्वीसारखी
वाटत नाही खुशीत
येत नाही जवळ आणि
घेत नाही मला कुशीत.

माहित आहे मला, रात्र
चिरःकाल टिकणार आहे
केंव्हा तरी कायमच झोपुन
मी तिला मुकणार आहे.

डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..