नवीन लेखन...

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  ।

आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। १

फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  ।

त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  ।।२

उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  ।

वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  ।।३

कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  ।

वाटत होते परकीय जे,  आज आपले होवून जाती  ।।४

आपलेपणाच्या भावामध्ये,  दडले असते प्रेम सारे  ।

शत्रू देखील तुमचे होतील,  समजूनी येता नाते खरे  ।।५

भाऊ बहीण, मामा, चुलते,  दूरवरची आप्त मंडळी  ।

बंधन ते पडून प्रेमाचे,  बांधली जाती एकत्र सगळी  ।।६

कुणास कळले याचक्षणी,  परका कुणीतरी दुरीचा  ।

नात्यामध्ये नजीक असूनी,  ऋणानूबंध तो पूर्वीचा  ।।७

ओढला जाईल आत्मीयतेने,  अज्ञानाचा पडदा उठता  ।

पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल,  आपापसातील मानवता  ।।८

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..