नवीन लेखन...

नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर

मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी झाला.

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.

सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले.

तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३० हून अधिक नाटके लिहिली. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. नाटक वेळेवर सुरु करणे आणि ते प्रामाणिकपणे सादर करणे शिवाय ते लोकप्रिय करणे त्याकाळात अवघड होते. बर्या्च नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती.

“दुरितांचे तिमिर जावो” या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे’ याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर ‘एखाद्यांचे नशीब’ या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले.

बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

मा.बाळ कोल्हटकर यांनी गीतकार म्हणून लिहिलेली गाणी

आई तुझी आठवण येते
आली दिवाळी दिवाळी
उठि उठि गोपाला
गजाननाला वंदन करूनी
तू जपून टाक पाऊल जरा
निघाले आज तिकडच्या
हा शब्द नवा
ऋणानुबंधांच्या जिथून

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर

  1. कृपया, एखाद्याचं नशीब हे नाटक रंगभूमीवर किती साली आलं ते सांगू शकाल का?
    या नाटकाचे प्राथमिक प्रयोग जयराम पंच शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांनी केले होते ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..