नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सोळा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार

जगण्यासाठी औषधं काम करत नाही. – भाग सात

ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ?

अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते.
एक श्लोक आपण बघितला होता…
दूष्य देश बल काल वय ……
…… अवस्थाश्च पृथक्विधः ।।

या श्लोकाचा पूर्ण सविस्तर अर्थ यापूर्वी बघितला असल्याने पुनरूक्ती दोष टाळण्यासाठी, पुढे जाऊया.

आपण जे औषध घेतोय त्याची गरज भासू नये, यासाठी आपला आहार संतुलीत असावा. सहा चवींचा समावेश नेहेमीच्या जेवणात असावा. खाताना, भीती बाळगून, फार चिकित्सक बुद्धीने खाऊ नये. आणि खाल्ल्यानंतर आठवत बसू नये. खाल्लेलं अन्न पचवायला पुरेसा वेळ द्यावा. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटकपदार्थ आतल्या आत तयार करता येतील. आणि बाहेरून काही भरावे लागणार नाही. म्हणजेच औषधांची गरज उरणार नाही.

यासाठी जेवणाची वेळ बदलावी. सर्व साधारणपणे सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खावे, नंतर शक्यतो काही खाऊ पिऊ नये. म्हणजे शरीराला आवश्यक ते घटकपदार्थ तयार पुरेसा वेळ मिळेल, आणि सगळी ए टू झेड द्रव्ये आतल्या आतच तयार होतील. हा विषय देखील सविस्तर यापूर्वी लिहून झालेलाच आहे.

विचारांचा गोंधळ होतोय ना !
आपण काय करतोय, दोन परस्पर विरूद्ध विचार एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गोंधळ होतोय. पाश्चात्य पद्धतीने आरोग्य आणि भारतीय पद्धतीने आरोग्य अभ्यासले तर ठीक आहे, पण दोन्ही पद्धतींना “काळाची गरज” या गोंडस नावाखाली एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वैचारिक गोंधळ होतोय. एकाच बाजूला येऊन विचार केला तर विचारांना स्थिरता येईल. मग आयुर्वेदात कॅल्शियम वाढण्यासाठी काय आहे ? थायराॅईडसाठी काय औषध सांगितले आहे? कॅन्सर वर काही आहे काहो उपाय ? असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

दोन भिन्न विचार प्रवाह एकत्र करणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या जीवनपद्धती मधे होत असलेला हा बदल एका मधल्या पिढीने आपल्या डोळ्यादेखत बघितला आहे.

औषधांशिवाय आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून आयुर्वेद शिकणं, जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.

कुछ पाने केलिए कुछ तो खोना पडता है ।
और यहा तो जिंदगी का सवाल है ।

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
25.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..