नवीन लेखन...

पुछो ना कैसे मैने रैन बिताई ?

अचानक आभाळ काळ्याकुट ढगांनी भरून यावं , तस हे गाणे ऐकलं कि होत . मन व्याकुळ होऊन जात . निराशेची धग काय चीज आहे हे जाणून घ्यायचे तर हे गाणे ऐकावे .

‘पूछोना कैसे मैने रैना बिताई , एक पल जैसे एक जुग बीता ,
जुग बिते मोहें निंदा ना आई ……… ‘

‘मेरी सुरत ,तेरी आंखे ‘ हा १९६३ सलातला एक सुंदर सिनेमा . एका कुरूप आणि दुर्दैवी जीवाची हि शोकांतिका होती . जे  जग ‘कुरुपतेले ‘झिडकारत त्या जगात हा जीव आपल्यासाठी ‘जागा ‘ शोधतोय ! हा कुरूप’ प्यारे ‘ अशोक कुमारांनी ताकतीने उभा केलाय .  ह्याच सिनेमातले हे गाणे .

हे गाणे सिनेमात दोन भागात आहे . पहिला भाग आहे ,ज्यात बाल अशोक कुमारला त्याचे सांभाळकर्ते वडील, कन्हैयालाल , हे गाणे शिकवतात . या गाण्यात त्यांनी जो गायक ‘गुरु ‘दाखवलाय तो पाहून त्यांच्या अभिनयाची उंची कळते . हा राग शिकवताना , स्क्रीन वरील त्यांच्या हरकती पट्टीच्या गायकाला लाजवतील अश्या आहेत ! कन्हैयालाल साठी पंडित शिव दयाळ बातीश आणि लहान अशोक कुमार साठी सुमन कल्याणपूर आवाज दिलाय . सुमन कल्याणपूर यांचा काय आवाज लागलाय ?, लहान मुलाच्या आवाजातला नैसर्गिक गोडवा जाणवल्या शिवाय रहात नाही !

हे गाणे’ अहिर भैरव ‘ या रागावर आधारित आहे . हा राग  दुसऱ्या प्रहराचा म्हणजे साधारण सकाळी सहा ते नऊ दरम्यानचा . Morning Melody म्हणावा असा . या गाण्याच्या पहिल्या भागात फक्त ‘ पूछोना कैसे मैने रैना बिताई ‘ हि एकाच ओळ घेतलीय . या ओळीची अनेक अंगानी गायकी  जी पंडित शिवदयाळजीं नी ऐकवली आहे , ती  या रागाचा वस्तुपाठच म्हणावा . नुस्ती आलाप आणि ताणांची बरसात  आहे ! या गाण्याचे संगीतकार सचिन देव बर्मन (दादा ),यांनी तबल्यावर लावलेला  अध्धा ताल या रागाची लय अन लज्जत वाढवून गेलाय . हा पहिला भाग म्हणजे ‘कानसेनां ‘साठी मेजवानी आहे .

दुसरा भाग म्हणजे सम्पूर्ण लांबीचे गाणे . यात मन्नाडे अशोक कुमारान साठी  गातात . एक दिवस काय झाले कि , सचिनदा ,रात्री नऊच्या दरम्यान मन्नाडे कडे ,हातात कागदाचा चिठोरा घेऊन आले आणि म्हणाले ‘ तुमची पेटी काढा ,हे नोटेशन ,उद्या आपल्याला हे गाणे रेकॉर्ड करायचे आहे !’ आणि हे गाणे तयार झाले . या गाण्यात मन्नाडे काय गाऊन गेलेत ?! त्यांच्या गाण्यातली सहजता इतकी सुंदर आहे कि ,या रागाच्या चौकटीत त्यांचा आवाज  एखाद्या घड्याळाच्या लंबका सारखा एका लयीत हेलकावे खातो . या गाण्याला हवी असलेली ‘करुणा ‘ त्यांच्या आवाजात आहेच .

प्यारे या पात्राच्या निराश मानसिकतेला , साजेलशे भावपूर्ण गाणे लिहलंय शैलेंद्रजींनी . या गाण्याच्या लेखनासाठी केवळ सलाम करून भागणार नाही , आजन्म ऋणी राहावे लागेल . इतकी घट्ट आणि जाड ‘निराशा ‘ कोणी गीतात बंदिस्त केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही !मन्नाडे याचा आवाज आणि अशोक कुमारचा अप्रतिम अभिनय दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फोडून  जाईल . मन्नाडेच्या आवाजातली कातरता  ‘ताडपत ,तरसत उमर गवाई ‘ हे पहिल्या कडव्यांच्या शेवटच्या ओळीला ,आणि ‘ ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे , भोरभी किरण कि आस न लाये ‘म्हणताना शिगेला पोहचते . ऐकताना वाटते डोळ्यातून पाणी झिरपले असतेतर बरे झाले असते , पण तसे होत नाही !मन सुन्न होऊन जात !

बरेच जण या गाण्याचा संबंध काजी नझरुल इस्लाम (हे बंगालीत रवींद्रनाथ टागोरां इतकेच आदरणीय साहित्यिक ,गीतकार आहेत )यांच्या ‘अरुणो कांती के —-‘ या बंगाली गीताशी जोडतात . हे बंगाली  गाणे आशा भोसलेंनी गायलंय . आजवर ओ .पी .नय्यरची  आशा भोसले ऐकणाऱ्यांना हा गोड धक्का असेल . कोठे तो लाडिक ,खट्याळ ,मदहोश सूर आणि कोठे हा सय्यमीत गोडवा . अर्थात दोन्हीही अफलातूनच आहेत . अवखळ ,डोंगर कपारीतून झेपावणारा नदी जेव्हा सखल मैदानी भागात येते, तेव्हा जशी शांत होते , तसा या गाण्यासाठी आशा भोसलेंचा सूर लागलाय , राग अहिर भैरावास साजेलसा  ! हे बंगाली गीत आणि ‘पूछोना कैसे मैने रैना बिताई , एक पल जैसे एक जुग बीता ,—-‘ हि दोन्ही गाण्याचे प्रेरणा स्थान , उस्ताद मुश्ताक हुसैन खान साहेबांच्या पारंपरिक बंदिश आहे .

एकूण काय तर सचिनदा ,मन्नादा , दादामुनी यांनी मिळून काळजाला हात घातलाय हे मात्र खरे . डोळे मिटून ऐकावे असे गाणे .

सु र कुलकर्णी .


आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . तोवर Bye .
(सदर लेखातील माहिती नेट वरील विविध site वरून मिळवली आहे . )

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..