नवीन लेखन...

कवि मंगेश पाडगांवकर

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,

हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,

खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,

देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,

शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील

म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

– मंगेश पाडगावकर/१९७५.

ही कविता लिहून मंगेश पाडगांवकर यांनी सरकारचा रोष ओढवून घेतला होता.

विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत, मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही. मलाही तसेच वाटते ही कविता म्हणजे एक शाप आहे?

लहानपणापासून वसंत बापट,विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर यांच्या कविता ऐकत होतो त्या कविताच ऐकत मोठे झालो.

मंगेश पाडगांवकर यांच्या काही कविता, गीते अमर आहेत, त्याचे भातुकलीच्या खेळामधली राजा राणी हे गाणे तर मला वेगळे गूढ वाटते ते त्यांच्या मानसिक अवस्थेचे.

त्यांची असंख्य गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..