नवीन लेखन...

पाऊस

मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर….. कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो……अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो…..बघा कधीतरी असं पहाटेचं शांत बसून…..निसर्ग खूप काहि शिकवून जातो अाणि निसर्गापुढे अापण किती खुजे अाहोत याची जाणीव करून देणार्‍या विधात्यासमोर अापण अापोअाप नतमस्तक होतो !

इथे माझी कल्पनाशक्ति संपली मित्र—मैत्रिणिंनो…..जे अाणि जसं सुचलं तसं पाठवतोय…..बघा अावडतंय का…..

कधी बरसतो धो धो पाऊस
मरगळ जाते दूर निघून
कधी परंतू अखंड रिपरिप
दूरदेशीची ती येई समीप

कधी अचानक झोडपतो मग
जशी अाठवण तुझी नी…तगमग
निरभ्र सारे अासमंत मग
अवतरते बघ थंडी होऊन

कळकटलेल्या किटलीमधला
घोट चहाचा अमृत होतो
शब्दहि येती अवचित ओठी
कॅनव्हास मग…..जिवंत होतो!

श्रेय कुणाचे , मिळते कोणा ?
निसर्ग असतो थोर गुरु
बांधून इमले शब्दांचे मग
कुणीही लागतो कविता करू

जलबिंदूंचा खारट साठा…
डोळ्यांमधूनी अवतरतो
अखंड उरतो तुझाच अाठव
तूमय तन्मय ….. उदय उरतो……

 

उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
२ जुलै २०१७..०५.२०वा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..