नवीन लेखन...

पंडित जवाहरलाल नेहरु

कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ७ फेब्रुवारी १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. सन १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे शालेय शिक्षण घरीच खासगी शिकवणीद्वारे घेण्यात येत असे. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणानिमित्त गेले. केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या विषयाची पदवी घेतली. १९१२ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी सामान्य राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना स्वातंत्र्यसंग्रामाबाबत विशेष रुची होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपसूकच खेचले गेले. सन १९१२ साली बंकीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९१९ साली होमरुल चळवळीचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. सन १९१६ साली त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीने प्रभावित झालेल्या जवाहरलाल नेहरु यांनी त्यानंतर १९२० साली उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. याच दरम्यान त्यांना असहकार आंदोलनामुळे दोन वर्षे कारावास भोगावा लागला. अल्मोरा कारागृहात त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केले. त्यांनी एकूण नऊ वेळा कारावास भोगला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..