नवीन लेखन...

‘नोटा – बदली’ नंतरचे ‘राज’ बदल ?

८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा – बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला.  कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . ” अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे .  या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे या निर्णयांचा पाठपुरावा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे . . . . सरकारच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही .

तेंव्हापासून माझ्या मनात असे येत आहे कि ही कदाचित केवळ सुरुवात आहे.  अगदी आर्थिक क्षेत्रापुरता विचार करायचा झाला तर वस्तू आणि सेवाकर ( GST ) ची अंमलबजावणी उशिरात उशीरा ऑगस्ट – सप्टेंबर २०१७ च्या सुमारास होणे, आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्चच्या ऐवजीजानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा होणे ,  वैयक्तिक आणि संस्थात्मक आयकरात दर आणि करपात्र उत्पनाच्या पातळ्यांमधे बदल होणे ,  जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार बन्कान्मार्फतच करण्याची सक्ती होणे ,  बन्कान्मार्फत होणारे व्यवहार हा काही प्रमाणात तरी कर – रचनेचा पाया होणे आणियावर्षी अर्थसंकल्प जरी १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होणार असलातरी नंतरच्या काळात तो नोव्हेंबर – डिसेंबर मधेच सादर होणे असे बदल होण्याचीशक्यता जरासुद्धा नाकारता येत नाही .

अर्थातच असे बदल फक्त आर्थिक क्षेत्रातच होतील असे मला आधीही वाटत नव्हते . आणि भारतीय लष्कराच्या सर – सेनापतीची नेमणूक करताना दोनआधिकार्यान्ची वरिष्ठता डावलली गेली हे पाहिल्यावर तर जास्तच तसे वाटू लागले आहे . पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहीजे कि त्याच आठवड्यातसर्वोच्च न्यायालयाच्या सर – न्यायाधीशान्ची निवड करताना अशी वरिष्ठता डावलली गेलेली नाही .  त्यात संबंधित न्यायाधीशनी काही अवघड निर्णयघेतले असले तरी सुद्धा !

त्यातच या दोन ( सरसेनापती आणि सरन्यायाधीश ) नेमणुका होत असतानाच त्याच काळात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्ष – पदी खासदारपूनमताई महाजन यांची नेमणूक , निवड होणे हे मोठे सूचक आहे . राजकीय क्षेत्रातही उलथापालथ होणार अशा अर्थाने ही नेमणूक सूचक आहे . महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुनढे यांचे पंख येणाऱ्या काळात छाटले जातील असा तर या नेमणुकीतुन दिला जाणारा संकेततर नाही ना हे बघणे महत्वाचे ठरू शकेल .  तसे नंतर करायचे असेल तर मुनढे – महाजन गटाच्या मंडळी कडून होऊ शकणार्या संभाव्य विरोधाची धारकमी करण्यासाठी मदत म्हणून तर ही नेमणूक आधीच केली गेली नाहीये ना हे तर येणारा काळच ठरवेल .

राजकीय क्षेत्रात होऊ शकणारा एक संभाव्य बदल म्हणजे २०१७ – १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत संमत झाल्यानंतर केंद्रीय मंत्री -मंडळात होऊ शकणारे बदल .  असे बदल होतील असे जर ग्रुहित धरले तर त्यापैकी एक बदल असा असू शकतो कि विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री मा . श्री. अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली .  अशी बदली जर झालीच तर जेटली ग्रुह , संरक्षण किंवा परराष्ट्र – व्यवहार यांपैकी कोणत्या खात्याचे तेमंत्री बनतील हे बघणे उदबोधक ठरेल .

कारण अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातले मंत्री आहेत .  २०१४ च्या मोदी लाटेत अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार -संघातून निवडणूक हरूनही ते अर्थसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत .  सुरवातीस तर अर्थखात्याबरोबरच संरक्षण खात्यासारख्या दुसऱ्याअतिशय महत्वाच्या खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता .

त्यामुळे अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली झालीच तरी ती परराष्ट्र – व्यवहार , संरक्षण किंवा ग्रुह अशा अतिशय मान्यवर आणि महत्वाच्या खात्यातच होण्याची शक्यता आहे . विद्यमान परराष्ट्रमंत्री मा . सुषमाजी स्वराज यांची नुकतीच एक मोठी सर्जरी झाली आहे . त्यामुळ मा . श्री . अरुण जेटली हे जर अशा संभाव्य फेरबदलात परराष्ट्रमंत्री झालेच तर सुषमाजी लोकसभा सभापती होण्याची शक्यता आहे .  भाजपाचे ज्येष्ठ नेते मा . श्री .लालकृष्ण अडवाणीजी यानी अलीकडेच संसद न चालल्याबद्दल केलेल्या निषेधाची दखल घेतल्याचा संकेत त्यातून दिला जाऊ शकतो .  सुषमाजी तशाही अडवाणी गटाच्या मानकरी असल्याची चर्चा माध्यमात होत असते हे लक्षात घेता तोही भाग असेल . निदान असू शकतो .  तसे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या सभापती मा . सुमित्राताई महाजन यांचा समावेश एकतर केंद्रीय मंत्रीमंडळात होऊ शकतो ( अटलजीन्च्या मंत्रीमंडळात त्यामंत्री होत्याच . ) किंवा एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ति होऊ शकते .

अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री होण्यास एकच अडचण वाटते आणि ती म्हणजे स्वतः पंतप्रधान मा . श्री .  नरेंद्र मोदी यांचे स्वतचेया खात्यात इतके सातत्यपूर्न लक्ष असते कि जेटली साहेबांसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू मंत्री ते या खात्यास देतील का ?  मात्र खरंच तसेच झाल्यास सध्या एम. जे . अकबर आणि व्ही . के . सिंग असे दोन मातब्बर राज्यमंत्री परराष्ट्र खात्यात आहेत . त्यातल्या अगदीच दोघांचीही या खात्यातून जरीबदली झाली नाही तरी निदान एकाची तरी होईल अशी शक्यता आहे .

जर अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री झाले नाहीत तर दुसरी शक्यता म्हणजे ते केंद्रीय ग्रुहमन्त्रि होतील . मात्र ते उत्तर प्रदेशच्याविधान – सभा निवडणुकात काय निकाल लागतो यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल .  उत्तर प्रदेशात भाजपाचे राज्य त्या निवडणुकात आल्यासमा . श्री . राजनाथसिंगजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास ही शक्यता जास्त आहे .

मा . श्री . अरुण जेटली अशा संभाव्य फेरबदलात जर ग्रुह किंवा परराष्ट्रमंत्री न झाल्यास संरक्षणमंत्री होण्याचीही शक्यता आहे . सध्याचे संरक्षणमंत्री मा. श्री . मनोहर पर्रिकर यांची कार्यक्षमता , निस्प्रुहता , निरलसता , बुद्धीमत्ता या कशाचाच प्रश्ण नाही . पण एका विशिष्ट वयाननन्तर सार्वजनिक पदीन राहण्याचा त्यांचा स्वतचाच स्वयंघोषीत निर्णय आणि काही कालापूर्वीच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ” संरक्षण खात्यात स्थिरावलो आहे , पणदिल्लीत नाही ” हे उत्तर यावरून ही शक्यता वाटते .

मा . सुषमाजी स्वराज यांच्या बाबत वाटणारी अजून एक शक्यता म्हणजे विद्यमान राष्ट्रपति मा .श्री . प्रणबकुमार मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाचा कार्यकालसंपल्यावर त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुषमाजी भाजपाच्या उमेदवार असू शकतात . ज्येष्ठतेच्या निकषांवर मा . श्री . लालकृष्ण अडवाणी हेत्यासाठीचे उमेदवार असायला हवे . पण सद्यस्थितीत ती शक्यता कमी वाटते . याची खात्री पटल्यामुळे तर खासदारकी सोडण्यास असल्याची चिडचिडत्यांच्याकडून व्यक्त झाली असेल का ?  मा . श्री . शरद पवार हे राष्ट्रपति पदाचे उमेदवार असण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटत असली ,मोदीसाहेब अधूनमधून पवार साहेबान्बद्दल कौतुकास्पद उदगार काढत असले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांनी जरी आत्ताच्यास्थानिक संस्थाच्या निवडणुकात नाव घेऊन टीका केली नसली तरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रपति पदासाठीच्या उमेदवारीला मोदी साहेबांचा भाजपपाठिंबा देण्याची शक्यता आजमितिला तरी फार कमी वाटते .  पण भाजपाने पुरस्कृत केले नाही तरी जर पवार साहेब राष्ट्रपति पदासाठी उभे राहिले तरशिवसेना काय भूमिका त्यावेळी घेते हे बघणे महत्वाचे ठरेल . मा . प्रतिभाताई पाटील यांना मराठी महिला या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्याच्या जरपुनरावृत्ति झाली तर त्यावेळी भाजप – शिवसेना यांचे परस्पर – संबध हा विषय त्यावेळी पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो .

अरुण जेटली साहेब यांची जर अर्थखात्यातून बदली झालीच तर नवीन अर्थमंत्री कोण असेल ?  राज्यसभा tv ला त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात दिलेल्यामुलाखतीनंतर डॉ . नरेंद्र जाधव यांच्या नावाची त्या पदासाठी काहीजण चर्चा करत आहेत . पण पंतप्रधानांची कार्यपद्धती लक्षात घेता ती शक्यता फारकमी वाटते .  मा . श्री . पीयूष गोयल भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार असूनही , मोदी साहेबांचे जुने निकटवर्ती असूनही पीयूष गोयल एकदम पूर्ण कॅबिनेटमंत्री झाले नव्हते हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल . सध्याचे रेलवे मंत्री सुरेश प्रभू यांची शक्यता तुलनेने जास्त वाटते . पण माझा अंदाज असाआहे कि जर खरोखरच नवीन व्यक्ति केंद्रीय अर्थमंत्री बनन्याची संधी असेलच तर ती व्यक्ति पीयूष गोयल असेल .  त्यांची मोदी सरकार मधलीआजपर्यंतची कामगिरी , त्यांची शैक्षणिक पात्रता , नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञला खडे बोल सुनावन्याचे त्यांनी दाखवलेले धाडस या गोष्टीइतकेच याबाबत महत्वाचे ठरू शकेल असा घटक म्हणजे मा . नरेंद्र मोदी यांची त्यांनी गेली अनेक वर्ष केलेली पाठराखण .  याबाबत मा . अरुणजेटली आणि पीयूष गोयल यांच्यत असणारे साम्य म्हणजे नरेंद्र मोदी हे अश्वमेध विजेते योद्धे आहेत हे त्यांनी फार पहिल्यापासूनच ओळखले . गोवाअधिवेशनात मोदिन्च्या नावाची अधिक्रुत घोषणा ही फार फार नंतरची बाब आहे . जेटली – गोयल यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून मोदी साहेबांनासक्रिय पाठिंबा दिला आहे .  याबाबत मा .  निर्मलाजी  सीतारामन आणि मा . श्री . जयंत सिन्हा यांची नावेही चर्चेत येऊ शकतात . पण या सगळ्यांतमा . श्री . पीयूष गोयल यांचे पारडे अरुण जेटली साहेबांची जागा घेण्यास मला जड वाटते .

जर कदाचित खरोखरच श्री . पीयूष गोयल हे केंद्रीय अर्थमंत्री झालेच तर आजमितिला त्यांच्याकडे असणारा ” एकत्रित ” उर्जा खात्याचा कारभार मा .श्री . जयंत सिन्हा यांच्याकडे जाऊ शकतो .  श्री . जयंत सिन्हा यांची अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून असणारी अत्यंत वाखाणणयाजोगी असणारीकामगिरी आणि आजपर्यंत नोटा – बदलीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारची बाजू जर सर्वात जास्त प्रभावीपणे जर कोणी मांडली असेल तर ती श्री जयंतसिन्हा यांनी हे दोन घटक याबाबत नक्कीच त्यांच्या बाजूने उभे राहतील . पण जर यदाकदाचित या खात्याचे मंत्री म्हणून जर जयंत सिन्हा यांना संधीमिळाली नाही तर ती संधी मा . निर्मलाजी सीतारामन यांना मिळेल असा माझा अंदाज आहे .

अजून एक ओझरता , पुसटसा विचार किंवा शक्यता . . . अगदीच लगेचच होईलच असेही नाही . . . पण मला वाटणारी शक्यता म्हणजे आपल्यामहाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश .  शब्द समावेश असा आहे . वर्णी असा नाही . त्यामुळेजेंव्हा केंव्हा असा बदल होईल तेंव्हा मा . श्री . देवेंद्रजी फडणवीस यांना केंद्रात चांगलेच खाते मिळेल . आणि जर खरोखरच देवेन्द्रजी केंद्रीय मंत्री झालेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मा . श्री . प्रकाशजी जावडेकर किंवा मा . श्री . चंद्रकांतदादा पाटील यांना मिळू शकेल .

अर्थातच हे सगळे अंदाज आहेत . पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांची खासियतच मुळी सर्वांचे अंदाज ( चांगल्या अर्थाने )’चुकवन्याची आहे .

(ही माझी वैयक्तिक मते आहेत . )

— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail : tilakc@nsdl.co.in

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..