नवीन लेखन...

निमित्त : १

‘उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली .

खरं तर या दोन्ही विषयांवर समाजमाध्यमात खूप लिहिलं गेलं आहे. तरीही मी पुन्हा पुन्हा गुंतत गेलो त्या उरी नावाच्या स्फुल्लिंग चेतविणाऱ्या चित्रपटाच्या विषयात .
मुळात तो चित्रपट नाहीच .
ती एक धगधगती , जाळून भाजून काढणारी वीज आहे, एक अंगार आहे आणि प्रत्येक देशभक्ताच्या मनातला केव्हाही उद्रेक होऊ शकणारा ज्वालामुखी आहे.
सर्जिकल स्ट्राईकच्या स्वरूपातील उरीचा घेतलेला बदला असं जरी वरकरणी वाटणारं कथानक असलं तरी त्यापाठी प्रत्यक्षात किती काय शिजलं असेल, किती, काय, कोणत्या स्वरूपातील राजनैतिक प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल, प्रचंड गोपनीयता ठेवताना संबंधितांचा संयम किती ठेवावा लागला असेल , या देशातल्या गद्दार नेत्यांच्या आणि मीडिया नामक टी आरपी साठी वखवखलेल्या भुतांच्या नजरेपासून किती सांभाळावं लागलं असेल ,त्याची एक टक्का का होईना कल्पना येते .
देशातल्या आणि विशेषतः दिल्लीतील दरबारी राजकारणापासून सर्वाना दूर ठेवीत खंबीर मनाने आदरणीय पंतप्रधान मोदीजी, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि ज्यांनी हे सर्व घडवून आणलं ते आदरणीय सैनिक आणि सर्व सैन्यधिकारी यांच्या मनातील अस्वस्थता , पाकड्याना धडा शिकविण्याची दुर्मिळ जिद्द ,देशवासीयांच्या मनातील पाक बद्दलचा संताप ,हे सर्व जुळवून आणायला जी धोरणात्मक आक्रमकता लागते त्याचं विलक्षण अनुकरणीय उदाहरण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर बघताना वाटलं , या पंतप्रधानांच्या काळात ,त्यांना हा असा निर्णय घेता आला असता ?
एका अत्यंत हुशार माणसाला, दरबारी , जी हुजूर ,हलकट हलक्या कानांच्या तथाकथित माणसांनी हे होऊ दिलं असतं?
हा चित्रपट बघताना वाटलं , मोदी येण्यापूर्वी आपला देश नेमकं कोण चालवत होतं ?
रशिया ? चीन? अमेरिका ? इटली ?
की भारताबद्दल दुहेरी निष्ठा ठेवणारे तथाकथित पुरोगामी ? की वामपंथी ? की नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे विचारवंत?
की देशातील सगळ्या संपत्तीचे आजन्म वारसदार समजणारे गांधी घराणे ?की त्यांच्या आड राहून ,यादेशातील सर्व सुखोपभोग घेण्यासाठी , पैसा ओरबडण्यासाठी आपापले सवतेसुभे निर्माण करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी ?
हा देश कुणाचा ?
लोक तुम्हाला निवडून कशासाठी देतात ?
निवडून आल्यावर ,पक्ष, जनता , विचारसरणी यांना तिलांजली का देता ?
असे किती तरी प्रश्न मनात उभे राहिले.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे केवळ आपल्या हातात आहेत हे जनतेच्या कसं लक्षात येत नाही ?
पाचशे , हजार च्या बदल्यात आपलं मत विकताना आपल्या आया बहिणींची अब्रू आपण विकतो आहोत अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात का निर्माण होत नाही ?
आणि मग महागाई झाली, भ्रष्टाचार वाढला, नेत्यांनी आपला देश विकायला काढला, विकास झाला नाही अशा आरोळ्या मारताना याच जनतेला लाज कशी वाटत नाही ?
हे सगळं मनात येतं , आणि वाटतं सैनिकांना काय वाटत असेल ?
जीवावर उदार होताना, या देशातल्या नेत्यांच्या कुपमंडूक वृत्तीमुळे आपली हानी होतेय हा विचार त्यांच्या मनात आला तर…
त्यांच्या मनातला देशभक्तीचा अंगार विझून जाईल .
लढण्याची उमेद संपेल.
आणि भारतमातेचं विदीर्ण रूप पुढच्या पिढ्यांना पाहावं लागेल.
म्हणून…
आपणच विचार करायला हवा .
खंबीर नेत्यांच्या आणि तितक्याच खंबीर सैनिकांच्या पाठीशी आपलं नैतिक बळ उभं करायला हवं .
उरीच्या निमित्ताने मला असं वाटलं, आपल्याला …?
***
–डॉ.श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी.
****
लेख नावासह शेअर करायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

2 Comments on निमित्त : १

  1. NAMASKAR, NIMITT VACHALE,AAPALYA MANATIL JALAHALAT SAMAJALA.PRATEK KSHETRA MADHYE KAHI CHANGALI PRAMANIK MANASE AJUNAHI AAHET MHANUN THIK AAHE PARANTU NASAKE KANDE AAHET TE CHANGALI KAME KARU DET NAHIT,

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..