नवीन लेखन...

नात्यांचा स्ट्रेस !

नाती -हवीहवीशी आणि त्रासदायकही ! निसर्गदत्त आणि बनविलेली ! जुळलेली आणि लादलेली ! निरपेक्ष आणि अपेक्षांचे ओझं असलेली ! एकतर्फी आणि दोन्ही बाजूंनी पेललेली !

प्रेम ,वात्सल्य ,माया ,आदर , भीती ,करुणा ,अहंकार ,राग ,द्वेष आणि अशा अनेक भावनांनी निथळणारी !! चोवीस तास आसपास – पिच्छा न सोडणारी . मग कधीतरी त्यांचा अनामिक स्ट्रेस वाटू लागतो. ती झुगारून द्यावीशी वाटतात. विशेषतः नात्यातील व्यक्तींच्या वागण्याचे संदर्भ लागेनासे झाले की निर्नात्याची ओढ लागते.

स्वच्छ, मोकळ्या नातेविरहित अवकाशाचे आकर्षण वाटू लागते. काही नाती विसर्जित करावी असे वाटते. किती नाती ,किती काळ आपण घेऊन फिरत असतो – त्यातील काही बिनकामाची ,उपयुक्तता सरलेली , ओझी म्हणून उरलेली ! बहुतांशी वेळी फक्त आठवणीत उरलेली !

मग जाताना सगळं विसर्जित करून मोकळ्या हातांनी /निर्विकार मनाने गेलेले काय वाईट ? BAGGAGE तरी कमी होईल .

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..