नवीन लेखन...

मुंबई महानगरपालिकेची अगम्य नावांची वॉर्ड सिस्टीम

मुंबई महानगरपालिकेची सध्या प्रचलीत असलेली महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डांना ए, बी, सी ते पुढे एक्स, वाय, झेड अशी इंग्रजी बाराखडीची नांवं देण्याची पद्धत अगम्य आहे..

सर्व कारभार मराठीतून करायचा (म्हणजे तसा ठराव करायचा, प्रत्यक्ष नाही केला तरी चालेल) आणि वॉर्डांची नांवं मात्र इंग्रजी अक्षरांची ठेवायची हा प्रकार माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला समजण्याच्या पलिकडचा आहे.

मित्रांनो, तुम्ही ज्या विभागात राहाता त्या विभागाला / वॉर्डला म्युन्शिपाल्टी कोणत्या इंग्रजी अक्षराने ओळखते हे तुम्ही चटकन सांगू शकाल का? नाही ना? मग माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाची काय परिस्थिती होत असेल याची कल्पना करा.

मी राहातो ते ‘दहिसर’ माहीत मला आहे परंतू त्याला बीएमशीच्या भाषेत ‘आर’ वॉर्ड म्हणतात हे कळायला बराच काळ जावा लागला..’एल’ मधून पत्र ‘पी’ वॉर्डात गेलं म्हणजे नेमकं कुठून कुठे गेलं, ‘जे’ वॉर्ड कुठेसा येतो हे बीएमशीचे कर्मचारीसोडून इतर कोणाला कळेल का याची खात्री नाही..

एकूण ‘ए’ पासून पुढे कोणत्या अक्षरापर्यंत वॉर्ड्स आहेत हे, मला १०० टक्के खात्री आहे, कोणीच चटकन सांगू शकणार नाही..या मुद्दाम निर्माण केलेल्या आणि टिकवलेल्या गोंधळाचा फायदा असहाय्य सामान्य माणसाकडून पैशे उकळण्यासाठी होतो.

त्यापेक्षा मुंबई महानगरातलं ते ते वॉर्ड ऑफीस त्या त्या ठिकाणाच्या प्रचलित नांवाने ओळखलं गेलं की असं काय आभाळ कोसळणार आहे? उदा. ‘आर-साऊथ/नॉर्थ’ ऐवजी ‘बोरीवली-दहीसर पश्चिम’ कार्यालय नाही का म्हणता येणार? ‘एफ साऊथ’ ऐवजी ‘परळ कार्यालय’ म्हणायला काय अडचण आहे? की त्यामुळे सामान्य माणसाला सर्व पटकन कळून प्रशासनाचं महत्व कमी होणार याची भिती वाटते?

बॅंका, पोस्ट ऑफिसं बीएमशीपेक्षा तितीतरी पटीने उत्तम व भ्रष्टाचारमुक्त कामं करतात, त्यांच्या कार्यालयावर त्या त्या परिसराचीच नांवं असतात..मग बीएमशी अशी काय वेगळी आहे? उलट नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा बॅंक/पोस्टापेक्षा म्युन्शिपाल्टीचा जवळचा संबंध असताना त्यात येवढी क्लिष्टता का?

इंग्रजी अंमलात १८६५ सालात स्थापन झालेल्या महानगरपालिकेचा कारभार त्या काळात इंग्रजी कारभार्‍यांच्या हातात असल्याने त्यांनी त्याच्या मातृभाषेचा वापर वॉर्डांना देण्यासाठी केला हे समजू शकते. परंतू स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षांनंतरही तीच नांवं कायम ठेवणार्‍या आपल्या देशी राजकारण्यांना व सनदी, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बुद्धीच्या पातळीची वाहवा करावी, शंका घ्यावी की कींव करावी असा प्रश्न मला पडलाय..अर्थात मी स्वत:ला अल्पबुद्धी असल्याचं जाहीर केलं असल्यामुळे विद्वान राजकारणी व स्मार्ट, अती शिक्षित अधिकायांच्या बुद्धीविषयी शंका घेण्याचा इतकासादेखील अधिकार नाही..

मनातली एक शंका आपली तुमच्यासमोर मांडली. यातून काही सुधार होईल याची यत्किंचितही अपेक्षा नाही..

— गणेश साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..