नवीन लेखन...

मातीचा देह मातीला शरण गेला

आजी आजोबा होते थकलेले
थकलेल्या वाड्यात रहात होते.

काळाने केला भयानक घात
सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात

पण पडताना वाड्याने हात टेकले
आजी आजोबांना त्याने वाचविले

जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले

आजी मात्र एकटीच राहिली धीराने
वाडा नाही सोडला तिनं हट्टाने

म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं

आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो

एके दिवशी आजीने देह सोडला
आणि आमचा उन्हाळा करपून गेला

एकाकी वाडा खूणवत होता
आतुरतेन आम्हाला बोलवत होता.

खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
मातीचा देह मातीला शरण गेला.

– डॉ. सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..