नवीन लेखन...

मनोरंजनाचे जग

निसर्ग हेच पूर्वी मनोरंजनाचे साधन होतं. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, चांदण्या, सूर्य याभोवती गाण्याचं इंद्रधनुष्य गुंफलं जायचं. निसर्ग जसा जसा कमी होत चालला, प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला. निसर्गदत्त सौंदर्य नजरेआड, दुर्मिळ होऊन प्रसारमाध्यमांतून अनेक गोष्टी झिरपू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रध्दा, पसरविणार्या् गोष्टी येत आहेत.

प्रत्येक मनोरंजन विकृतीच घेऊन येत असेल तर संस्कृतीचे तीन तेरा होणारच. मनोरंजनापुढे ज्ञान, माहिती, मूल्ये, संस्कृती दुय्यम ठरत आहेत. आधी मनोरंजन, मग त्यातील गोष्टींचा हव्यास, मनोरंजनाच्या वेळापत्रकात अभ्यासाला वेळच नाही. आधी अभ्यास, मग मनोरंजन ठीक. दप्तर फेकून दिलं की खेळ, नंतर गप्पा मग अभ्यास, हा क्रमच बदलला. गप्पा बंद झाल्यामुळे व्यक्तीमत्वाच्या विकासाचा कप्पा बंद झाला. हाताची घडी तोंडावर बोट हे शाळेआधी कुटुंबातच प्रसारमाध्यमांनी घडवून आणलं. माहिती व तंत्रज्ञानाचे केवळ मनोरंजन व तंत्रज्ञान होऊ नये. आजच्या मुलांचा मनोरंजनाचा कालावधी अभ्यासापेक्षा वाढलाय. मुले अनुकरणप्रिय असतात. टी.व्ही. वरील जाहिरात, गाणे, अंग विक्षेपासह म्हणणार्याअ चिमुरड्यांना कवितेचे एक कडवेही म्हणता येऊ नये, हा मनोरंजनाचा अभाव का शिक्षण पध्दतीचा पराभव? समजावा. प्रबोधनासाठी आलेली समूहसंपर्क साधने मनोरंजनाच्या मलीद्यावर जगत आहेत. जे मोठ्यांनी मोठेपणी पाहिलं ते मुले पाहून बसलीत. मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक शिक्षण ऐवजी विकृत बाजू मुलांच्या भावविश्वात खळबख उडवत आहे. प्रसारमाध्यमांतून ज्ञान कमी व मनोरंजन जास्त होत आहे.

मनोरंजनाचे आजच्या समाजाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. ज्या प्रमाणात भोवतालचा निसर्ग कमी झाला, सजीव माणसांचा गोतावळा कमी झाला. निसर्गाचा आनंद कमी अनुभवायला मिळाला. प्रसारमाध्यमातील मनोरंजनाने निसर्ग जो खरा गुरु त्याची जागा घेतली. ज्ञान मिळत आहे, पण नको ते ज्ञान ही मिळत आहे. सजीव माणसांची घरातील आंतरक्रिया बंद होऊन प्रसारमाध्यमांतील मनोरंजनाने माणसांना गुंतवण्यात यश मिळवले. प्रेम, वासना, विकृती, अंगविक्षेप, हसणं, खिदळणं, उपहास, रॅगींग, द्वेश यात ही मनोरंजन शोधणारे आहेत. वैचारिक नाळ तोडून मनोरंजन फोफावत आहे. कुटुंब या मालिकेत एकमेकांशी द्वेषापोटी, बदला घेण्यासाठी विवाह दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापर्यंत मजल गेली आहे. संस्कार मोडीत काढत, व्यभिचार रुजवणार मनोरंजन, आचार-विचाराला तिलांजली देणारं मनोरंजन, रुजतच नाही तर रुचत आहे. जाहिरातीच्या माध्यमातून स्वाभीमान, शांती नसलेल्या, श्यामची आई नसलेल्या समाजात मुलाला ही बापाच्या नावाऐवजी “I am complan boy”म्हणून धन्यता वाटत आहे. संस्कृती समोर आणण्याऐवजी विकृती समोर आणून डोळ्यात अंजन घालायची वेळ आली तर मनोरंजनाच्या माध्यमातून मूल्यांना केव्हाच खुंटीला टांगलंय. मनाचे श्लोक जाऊन, व्यभिचाराचे स्त्रोत पदोपदी मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत.

जाहिरातीत ही “ती” च्या शिवाय मनोरंजन नाही. बलात्कार, खून, दरोडे, अपघात, अंधश्रध्दा, भयकथा, प्रेमकथा, यातून मनोरंजनाची पेरणी होत आहे. राजकारण, संसदेतला आरडाओरडा, तमाशा, साहेबांनी तिकीटासाठी बंगल्यावर बोलावणं, या मनोरंजनाच्या बाबी बनत आहेत. घरातील वहिन्या जाऊन, वाहिन्या आल्या. नको ते दाखवू लागल्या. शिकवू लागल्या. घरात माणसांना अबोल राहण्याची संधी मिळत आहे. हाताची घडी, तोंडावर बोट हे शाळेत सुरु होण्याऐवजी घरातच सुरु झालं. जाहिराती मनोरंजनाचे साधन बनत आहेत. टुकार जाहिराती अंदर की बात म्हणत लोकांना उल्लु बनवत आहे. अभिमानाने पेप्पीसाठी, एका पेप्पीसाठी लहान मुलांबरोबर लाचार व्हावं, “अतिथी देवो भव” हा संस्कार रुजणार कसा? एक तीळ सात जणांनी वाटून घेतला, हे मुलांवर बिंबणार कसं? पेप्सी पुढे सगळं नगण्य. आचारसंहितेला छेदून जाहिरातीतील मनोरंजन मूल्यांना गुंडाळून ठेवत आहे. सगळं स्वतःसाठी…. दान, त्याग याची महती कळणार कशी?

मनोरंजनाचे संदर्भ बदलत चाललेत व्यक्तीपरत्वे बदलत आहे. पूर्वी भजन, कीर्तन यातून आधी उद्बोधन व नंतर मनोरंजन हा हेतू होता. प्रेम हे मानवी मनाला पडलेलं सुंदर स्वप्न, एक अविष्कार, पण त्याच्याकडे सुध्दा मनोरंजन म्हणून पाहिलं जात आहे. एकाचं दुसर्यापवर दुसर्यारचं तिसर्या्वर … अमर्यादित, तीन तासांचा चित्रपट पाहून पोरगी गटवणं, प्रेम हा जन्मसिध्द अधिकार, प्रेम एकांवर, विवाह दुसर्यााबरोबर, संबंध तिसर्यााबरोबर व यातून मनोरंजन हेच ध्येय तरुणांसमोर आहे. त्यातून मनोरंजन स्वस्त झालं आहे. जळी, स्थळी, काष्टी मनोरंजनच शोधणारी पिढी वास्तवापासून खूप दूर चालली आहे. व भयानक वास्तवाला समोर जात आहे. जीवन म्हणजे स्वप्न, मनोरंजन शब्दाच्या पलीकडे शरीराच्या पलीकडेही काही आहे, याचं भान राहिलं नाही. आधुनिकतेमुळे भरपूर वेळ मिळत आहे. बोअर होतं म्हणून भोगवाद, चंगळवाद, मनोरंजनाच्या नावाखाली चालू आहे. संस्कार व श्रमसंस्कारपासून दूर गेलेल्या समाजात मनोरंजनाने धुमाकूळ घातलाय. तृप्ती, समाधान नाहीच. “ये दिल मांगे मोर” म्हणत असमाधानच.“ठेवीले अनंते तैसेची रहावे” ही वृत्ती राहिलीच नाही. भ्रष्टाचाराने घरात लक्ष्मी नव्हे तर भौतिक वस्तूंची रेलचेल नांदत आहे. कीव आणणार्याह गोष्टीतून मनोरंजन शोधलं जात आहे. नैतिकतेला गाडून भौतिकता आली की, काय होणार? मनोरंजन हे जीवनाचे वास्तव नव्हे. विरंगुळा आवश्यक पण जीवनाचा पांगुळगाडा ओढण्यास तोच कामी येत नाही. व्यक्तीमत्वाला आकार देणार, घडविणारं मनोरंजन हवं, व्यक्तीमत्व दुभंगणार मनोरंजन धुमाकूळ घालत आहे. देवाची स्थळे, सहलीची स्थळे झाली आहेत. देवाला देवीला जाण्यातही मनारंजन महाविद्यालयात जाण्यातही मनोरंजन. थ्रीलच्या नावाखाली मनोरंजन शोधणं सुरु आहे. मनोरंजनाच्या नावाखाली नको ते खाणं, पिणं, पाहणं आलं आहे. जीवनातल्या प्रश्नापेक्षा मनोरंजनाचे प्रश्न पिढीला पडत आहेत. प्रसारमाध्यमांतून मनोरंजनाच्या नावाखाली अंधश्रध्देबाबत, प्रेमाबाबत, विवाहबाह्य संबंधाबाबत, काम जीवनाबाबत, मानवी स्वभावाबाबत संभ्रम होणार असेल तर त्याचे विकृतीचे संस्कार कशाला? आपल्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा. मनोरंजनातून फसवणूक जोपासली जाणार असेल तर आदर्शचे अग्रलेख कशासाठी? आहे मनोहर तरी शरदाच्या चांदण्यांची दुसरी बाजूही लोकांसमोर यायला हवी.

क्षणाची प्रसारमाध्यमे अनंतकाळची प्रसारमाध्यमे ठरत आहेत. कोणत्या गोष्टीचा प्रचार करायचा व कोणत्या गोष्टी पसार करायच्या हे आजच्या मनोरंजनाच्या जगात महत्वपूर्ण ठरणार आहे.

– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..