नवीन लेखन...

माणसांना उभे करणारे शब्द !

दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे.

त्यावरून दुसरे गाणे आठवले-

” हैं रातभर का ये मेहमान अंधेरा
किससे रोके, रुका हैं सवेरा II ”

अशा उभारी देणाऱ्या ओळी ऐकल्या की पायात बळ येते.

परवा माझा मित्र रामकृष्णा संजीवी चेन्नईहून माझ्याशी अर्धा तास भरभरून बोलत होता- नुकत्याच आत्महत्या केलेल्या आमच्या वर्गमित्राबद्दल ! त्याचा इत्यर्थ इतकाच होता- ” बाबा रे, आपल्या सगळ्यांना समस्या असतात, पण म्हणून हे टोकाचे पाऊल ? आपले कित्येक वर्गमित्र आर्थिक, शारीरिक विवंचनेत आहेत. पण कोणी अद्याप रण सोडलेले नाही. ”

आणि नुकत्याच एका पोस्टमध्ये मी ज्या “संसार हैं एक नदियां ” चा उल्लेख केला आहे, त्यांत “अभिलाष ” नामक गुमनाम गीतकाराने जीवनचक्र बहारदार पद्धतीने लिहून ठेवलंय –

“धरती पे अम्बर की आँखों से बरसती है
इक रोज़ यही बूँदें, फिर बादल बनती हैं
इस बनने बिगड़ने के दस्तूर में सारे हैं I ”

मग सगळीकडे तत्वज्ञान ओतणारा राज कपूर मागे कसा राहणार ? तोही ” जागते रहो ” मध्ये सुचवितो –

” जिसने मन का दीप जलाया
दुनिया को उसने ही उजला पाया
मत रहना अँखियों के सहारे
जागो मोहन प्यारे I ”

अझीझ नाझा ची “चढता सुरज ” ही आख्खी कव्वाली जीवनाचे वैय्यर्थ अधोरेखित करणारी आहे. पण समर्थांचं सगळं साहित्य पायबळ देणारे स्फूर्तिदायी आहे. खेबूडकरांची सगळी शालागीते मन प्रसन्नतेने भरून टाकणारी आहेत. गुलज़ार / गदिमा /साहिर पावलोपावली उत्साह पेरत असतात.
” इतनी शक्ती हमें देना दाता ” मध्ये विनवणी, आर्जव असलं तरी खंबीर मनही आहे.
कितीतरी उदाहरणे आहेत अशा शब्दांची !

” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे.

देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी !

अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –

” तुझ्या -माझ्या माथ्यावरती आकांक्षांचा चंद्र आहे I
नको असा उदास होऊस, मला वचन याद आहे II ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..