नवीन लेखन...

माझा भारत

दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो
वेड्यासारखा मी पुटपुटतो
माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥

तुझ्यावर जगणारी पाहून
टोपीखालची बांडगूळं
मी उगा विव्हळतो
माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥

तुझ्या वेदनेची कळ
माझ्या काळजात उठते
माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा
माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥

तूच माझा जिव्हाळ्याचा
एकमेव अर्थ जगण्याचा
सत्ताधांना मग का न कळावा
माझा भारत, माझा भारत ॥ ४ ॥

अर्थ दुबळेपणाचा नसतो
तुझ्या सोशिक शांततेला
जिथे ज्योतीतही सामर्थ्य वणव्याचे
तो माझा भारत, माझा भारत ॥ ५ ॥

इथे असते गार सावली
-भव्य हिमालयाच्या छातीची
इथे सौंदर्याला येतो-
-गंध मोहक पावित्र्याचा

इथे निष्पापतेला जोड असते
–समर्थ अशा निर्भयतेची
इथे शांतिपूजक तुम्हां कवटाळतो
–माझा भारत, माझा भारत ॥ ६॥

परकी-संस्कार छायेतल्यांना
उमगत नाही भारताचा गाभा
अखंड इथे पाझरवतो वात्सल्यझरा
माझा भारत, माझा भारत ॥ ७।।

गुलामगिरीच्या निशाण्या अन्
बाळगिती, म्हणती निर्लज्जतेने
ज्ञानकक्षा की हो रुंदावल्या
हजारो अनामिक हुतात्म्यांचा
अपमान पाहून व्यथित होतो
माझा भारत, माझा भारत ॥ ८॥

गलिच्छ डाग पारतंत्र्याचा
पुसला अपुल्या रक्ताने
त्यांच्याशी कायम कृतज्ञ
माझा भारत, माझा भारत ।। ९ ।।

झगमगाटाहून दूर एकांती
स्मरतो भक्तीभावाने लोकमान्यांना
‘मोडेल पण वाकणार नाही’
माझा भारत, माझा भारत ॥ १० ॥

माझ्या काळजाचा तुकडा
विसावा जेव्हा त्याच्या जखमेला
तेवढ्यानेही तो गद्गद्तो
माझा भारत, माझा भारत ॥ ११ ॥

शत्रूलाही ‘सांभाळणाऱ्या खुर्चीचे
का न कळे, न जुळे आपल्याच मातीशी
पुकारतो दोन्ही हाती त्यांना
माझा भारत, माझा भारत ॥ १२ ॥

वैयक्तिक स्वार्थ जेव्हा तुडवतो
हजारो निष्पाप आशाआकांक्षा
अन्यायाने पेटून उठतो
माझा भारत, माझा भारत ॥ १३ ॥

माझ्या भारताला पोहोचतो
टाहो त्याच्या, कणाकणाचा
भरल्या नयनी तो तळमळतो
माझा भारत, माझा भारत ॥ १४॥

माझ्या भारताला आज-
गरज समर्थ हातांची
या शक्तींनो देऊ शाश्वती–
उज्वल उद्याच्या भवितव्याची
हाक तुम्हाला, तुमच्यासाठी-
आसुसलेल्या देशाची
माझा भारत, माझा भारत ॥ १५ ॥

सुवर्णधूर निघो हजार वाटा
हजार हातांनो अविरत झटा
समर्थतेच्या कळसास नेऊ या
माझा भारत, माझा भारत ॥ १६ ॥

कृष्णाची करांगुली कुणी मला द्या
ज्याने नेईन मी हा गोवर्धन
पुन्हा वैभवशिखरी विराजमान
माझा भारत, माझा भारत ॥ १७॥

— यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..