नवीन लेखन...

गीतकार नितीन आखवे

गीतकार नितीन आखवे यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला.

नितीन आखवे हे आयडीबीआय बँकेत नोकरी करीत होते. आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला. संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली. श्रीधर फडके यांच्या ‘लिलाव’ या नव्या ध्वनिफितीमधील ‘इतिहास कालचा अभिमान सांगतो’ या गाण्यानेही रसिकांची दाद मिळवली होती. ‘फुलले रे क्षण’ हा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे. ‘क्षण’ या चित्रपटातली गाणी नितीन आखवे यांनी लिहिली होती.

नितीन आखवे यांचे ८ एप्रिल २०१२ रोजी निधन झाले.

https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk

https://www.youtube.com/watch?v=6WW5iF2MLeY

https://www.youtube.com/watch?v=nHA-wDYIbt4

https://www.youtube.com/watch?v=UyK2GMvyNok

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..