नवीन लेखन...

प्रेम लग्नानंतरचं…

एकदा एक फोन आला
म्हणाली छान लिहीता,
कवी महाशय सांगा ना
तुम्ही कुठे रहाता…

मी ही थोडा बावरलो
भलतच हे अघटीत,
डायरेक पत्ता विचारते
बाई पहिल्याच भेटीत….

हळुहळु जिव गुंतला
रोज फोन यायचा,
घरात असल्यावर जीव
धाकधुक व्हायचा….

कळलं जर बायकोला तर
आपलं काही खरं नाही,
या वयात प्रेम करणं
हे काही बरं नाही…..

तासनतास चॅटींग मग
व्हाटसपवर करायचो,
मी ही मलाच विसरून
तिचा होऊन उरायचो….

बस झालं म्हटलं आता
एकदा तरी भेट दे,
मोहरलेली ,मंतरलेली
सोनेरी पहाट दे……

ठरला दिवस ठरली वेळ
ठरल्या जागी गेलो मी,
जवळ जाताच तिच्या
कावरा बावरा झालो मी….

दुसरी तिसरी कुणीच नसुन
होती माझी बायको,
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे
धंदे ते नको नको…..

कसा बसा घरी आलो
युद्ध घनघोर चाललेले,
ऐकवत होती एकेक शब्द
फोनवर बोललेले….

आपल्या ताटातलं सोडुन म्हणे
दुस-याच्या ताटावर डोळा,
वाढायला गेल बुंदी तर
आवडतो शंकरपाळा…

कधीकधी झाला प्रसंग
डोळ्यापुढे आणतो,
चुकुन कुणाचा आलाच फोन
तर ताई असंच म्हणतो…..

कवी : अनोळखी

— WhatsApp वरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..